शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बालकाचा मृत्यू झाल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:01 IST

डॉक्टरांचा हलगर्जीपणा

ठळक मुद्देमुक्ताईनगरच्या कुटुंबीयांचा आरोपडॉक्टरावर कारवाईची मागणी

जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्नव नीलेश पाटील (रा़ मुक्ताईनगर) या ४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कुटुंबीयांनी गोंधळ घातला़ हा प्रकार मू़जे़ महाविद्यालय परिसरातील शिवम हॉस्पीटल येथे घडला़दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली़ बालकाच्या श्वास नलिकेत आधीपासून काही तरी अडकले असल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ़ पंकज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगरातील नीलेश पाटील यांनी मुलगा अर्नव यास निमोनिया झाल्यामुळे त्यास मुक्ताईनगर नंतर भुसावळ व अखेर ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगावातील शिवम हॉस्पीटल येथे उपचारार्थ दाखल केले़अर्नव यास श्वास घेण्यास त्रास होत होता़ मात्र, एक दिवस उपचार घेतल्यानंतर अर्नवच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली़ शुक्रवारी पुन्हा त्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला़ त्यामुळे हा त्रास का होतो हे तपासण्यासाठी डॉ़ पंकज पाटील यांनी कुटुंबीयांना अर्नव यांचे सिटीस्कॅन करण्यास सांगितले़दुपारी १२ वाजता सिटीस्कॅनसाठी बालकास नेले़ परंतू, तो हालचाल करीत असल्यामुळे त्यास भूलचे इंजेक्शन देण्यात आले़ यानंतर पुन्हा भूल देण्यात आली़ सिटीस्कॅन झाल्यानंतर बालकास रूग्णालयात नेण्यात आले़ रूग्णालयात आल्यानंतर बालकाचा मृत्यू झाला़डॉक्टरावर कारवाईची मागणीबालकाचा मृत्यू होताच कुटुंबीयांनी रूग्णालयात हंबरडा फोडला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला व कारवाईची मागणी केली. एक ते दीड तास हा गोंधळ सुरू होता़रूग्णालयात आलेल्या पोलिसाने बालकाच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला़ यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी धाव घेतली़ यावेळी डॉक्टरांनाही बोलविण्यात आले़ कुटुंबीयांनी घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला़ मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही़५ सप्टेंबरला बालकास उपचारार्थ दाखल केले होते़ दुसऱ्याच दिवशी प्रकृतीत सुधारणा झाली़ मात्र, शुक्रवारी बसल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बालकास सिटीस्कॅनसाठी पाठविले़ मात्र, बालकाच्या हालचालीमुळे सिटीस्कॅन बरोबर झाले नाही़ ताप आल्यामुळे त्यास इंजक्शन सुध्दा दिले होते़ दरम्यान, श्वास नलिकेत काही तरी अडकलेले होते़ त्यामुळे बालकाचा मृत्यू झाला़-डॉ़ पंकज पाटील़

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव