शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

महाविकास आघाडीत अंतर्विरोध प्रबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:35 IST

शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस या तीन स्वतंत्र पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी व्यवस्थेचा अभाव , मुक्ताई साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणातून दरी उघड ; नंदुरबारात आघाडीचे अस्तित्व शिवसेनेच्या हाती

मिलिंद कुलकर्णीभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्टÑात वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ‘महाविकास आघाडी’च्या छताखाली एकत्र आले. सरकारची सुरुवात अडखळत आणि संथ आहे, तीच स्थिती जिल्हा पातळीवर लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आहे. एकमेकांविरुध्द लढून निवडून आल्यानंतर त्याच पक्षासोबत सत्ता राबवायची म्हटल्यावर खडखडाट होणार आहे, ते अपेक्षित आहे. परंतु, मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणावरुन सेनेच्या दोन लोकप्रतिनिधींमधील दरी आणि कॉंग्रेस-राष्टÑवादीच्या संचालकांचे खडसेंना समर्थन ठळकपणे समोर आले.महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्ष शिवसेना तसेच राष्टÑवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. दोन्ही काँग्रेसची विचारधारा, कार्यपध्दती एकसमान आहे. पण शिवसेना या दोघांपासून भिन्न आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता थोडा खडखडाट, वादविवाद, अंतर्विरोध अपेक्षित आहे. ते वाढू नये, याची काळजी घेण्यासाठी राज्यस्तरापासून तर जिल्हा स्तरापर्यंत समन्वय, सुकाणी समिती गठीत करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षनेतृत्वाविरुध्द बंड पुकारले आहे. स्वाभाविकपणे इतर पक्षांना त्यांच्याविषयी ममत्व वाटणारच. परंतु, त्यांच्या मतदारसंघातील मूळ शिवसेनेचे परंतु, राष्टÑवादी समर्थित अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई साखर कारखान्याला जिल्हा बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाविषयी आक्षेप घेतला. परंतु, संचालक मंडळात असलेल्या शिवसेनेच्या तसेच दोन्ही काँग्रेसच्या संचालकांनी कोणताही विरोध न करता कर्ज मंजूर केले. खडसे यांच्याविरोधात संघर्ष करणारे नेते आणि कार्यकर्ते मुक्ताईनगरात आहेत, त्यांना नव्या सरकारकडून बळ मिळाले नाही, तर लढाई लढायची तरी कशाला, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होईल. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पाटील हे आमचेच आहेत, असे जाहीर केले होते. मग तरी आमदार पाटील एकाकी का पडले, हा प्रश्न आहेच. तेथील कॉंग्रेस, राष्टÑवादीची अवस्था तशीच झाली आहे. राज्य पातळीवरील नेते खडसेंशी चांगले संबंध ठेवतात आणि संघर्षासाठी केवळ स्थानिक कार्यकर्त्यांनी लढावे, ही अपेक्षा ठेवण्यात काय हशील? असा संघर्ष केवळ मुक्ताईनगरात नाही तर प्रत्येक ठिकाणी होणार आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तेची चावी आता शिवसेनेच्या हाती आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेचे बळ वाढले. विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी यांनी चांगली लढत दिली. जि.प.निवडणुकीत ७ जागा जिंकल्या. आघाडीधर्मानुसार सेना काँग्रेसकडे जायला हवी, आणि रघुवंशी हे मूळ काँग्रेसी असल्याने त्यांचे सुरुपसिंग नाईक, के.सी.पाडवी या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. पण ते आता सेना नेत्याच्या भूमिकेत असल्याने पक्षाचे सदस्य, कार्यकर्ते यांना सत्तेत वाटा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. विधानसभा निवडणुकीत रघुवंशी यांचे भाजप नेते डॉ.विजयकुमार गावीत यांच्याशी असलेले संबंध सुधारले. युतीधर्माचे पालन दोघांनी केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना एकत्र येऊ शकते. अशी उदाहरणे आहेत. दोन्ही शक्यता आहेत. त्यामुळे काय निर्णय होतो, यावर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या ७ सदस्यांच्या समर्थनाशिवाय कोणाचीही सत्ता येऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. चंद्रकांत रघुवंशी हे सेनेचे नेते असून ते पक्षनेतृत्वाशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. रघुवंशी मूळ काँग्रेसी असल्याने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास आघाडी मजबूत होईल. भाजपला पाठिंबा दिल्यास वेगळे समीकरण तयार झाल्याचा संदेश राज्यभर होईल. या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव