शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:42 IST

११पैकी सात ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीने वाढविला सेनेचा संताप

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीचा विचार केला तर यंदा भाजपच्या वाटेला सात जागा आल्या खºया मात्र युती असतानाही शिवसेनेचा उमेदवार असलेल्या जिल्ह्यातील चारही मतदार संघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा संताप वाढविला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे, त्या मतदारसंघात अटीतटीचे अंदाज वर्तविले जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११ पैकी सहा जागा भाजपच्या ताब्यात असल्या तरी या निकालात आपले वर्चस्व भाजप कायम राखते की शिवसेना मुसंडी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.२०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी युती नसल्याने भाजप व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी भाजपने सर्व ११ जागी उमेदवारी दिली होती. त्यात सहा मतदार संघात त्यांना विजय मिळविता आला. या विजयी उमेदवारांमधील जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन, जळगाव शहर मतदार संघातून आमदार सुरेश भोळे, भुसावळमध्ये संजय सावकारे, रावेरमध्ये हरिभाऊ जावळे यांना या वेळी उमेदवारी मिळाली. मात्र उन्मेष पाटील यांची खासदारकीपदी वर्णी लागली तेथे मंगेश चव्हाण तर मुक्ताईनगरातून विजयी एकनाथराव खडसे यांना उमेदवारीच नाकारण्यात येऊन त्यांची कन्या अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांना व अमळनेरातून गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवित विजय मिळविणारे आमदार शिरीष चौधरी यांनी संधी मिळाली.या सात जागा भाजपच्या वाटेला आल्यानंतरही शिवसेनेची उमेदवारी असलेल्या चार मतदार संघात भाजपच्या पदाधिकाºयांनी बंडखोरी केली. यामध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून चंद्रशेखर अत्तरदे, चोपडा येथे प्रभाकर सोनवणे, एरंडोलला गोविंद शिरोळे, पाचोºयात अमित शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे नाराजी व्यक्त केली. या विषयावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतच जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मतदानाच्या दिवशीदेखील त्यांनी भाजपकडून केवळ २० टक्केच सहकार्य मिळाल्याचे सांगत उघड-उघड नाराजी व्यक्त केली.बंडखोरी झालेल्या मतदार संघात वेगवेगळ््या सर्व्हेनुसार अटीतटीच्या लढतीचे अंदाज वर्तविले जात आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेच उमेदवार गुलाबराव पाटील यांना प्रतिस्पर्धीपेक्षा झालेल्या एकूण मतदानापैकी केवळ दोन टक्के मते जास्त असल्याचा अंदाज सांगितला जात आहे. अशाच प्रकारे चोपडा मतदार संघात लता सोनवणे यांना एक टक्केच मते जास्त असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.शिवसेनेचीही भाजपच्या मतदारसंघात बंडखोरीमुक्ताईनगर मतदारसंघातही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी केल्यामुळे येथेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या ठिकाणीही चंद्रकांत पाटील यांना मिळणाºया मतांमध्ये व भाजपच्या उमेदवार अ‍ॅड. रोहीणी खडसे यांच्या मतांमध्ये केवळ पाच टक्क्यांचा फरक वर्तविला जात आहे.एकूणच २०१४मध्ये ११ जागा लढवून सहा ठिकाणी विजय मिळणाºया भाजपने या वेळी सात जागा व चार ठिकाणी केलेली बंडखोरी यामुळे एक प्रकारे सर्व ११ ठिकाणी भाजपने निवडणूक लढविली. त्यामुळे आता किती जागांवर भाजप विजय मिळविते, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव