शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:05 IST

दोन आठवड्यात तिस-यांदा ढगाळ वातावरण

ठळक मुद्देजळगाव शहरासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावजोरदार पाऊस झाल्यास नुकसान

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन पुन्हा शेतकºयांची चिंता वाढविली आहे. गुरुवारी सकाळी काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. तीन आठवड्यांपासून अधून मधून वातावरण बदलत असल्याने शेतमालाचे नुकसान होण्यासह आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चार-पाच दिवसाआड ढगाळ वातावरण होत आहे. सोबतच पावसाचाही शिडकाव होत आहे. उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा हवामानावर परिणाम होऊन दोन आठवड्यांपासून अशी स्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ५ मार्च रोजी ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ११ मार्च रोजी तशीच स्थिती होती. आता पुन्हा १५ मार्च रोजी सकाळपासूनच शहरात व जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सोबतच जळगाव शहरातील काही भागासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला.बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीचे काम शेतकºयांनी पूर्ण केले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. बाजरी, ज्वारीही काढण्यात आली आहे. मक्याची काढणी मात्र बाकी आहे. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता रेकॉर्डवर घेण्याइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होणार नाही. तसेच बहुतांश पीक काढले गेले आहे. किंवा काढणी सुरू आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाचा त्यावर परिणाम होण्याची भीती नाही. फक्त जोरदार पाऊस आल्यास मात्र या काढणी सुरू असलेल्या पिकावर डाग पडण्याची व ते पीक खराब होण्याची भिती असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस