शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:05 IST

दोन आठवड्यात तिस-यांदा ढगाळ वातावरण

ठळक मुद्देजळगाव शहरासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावजोरदार पाऊस झाल्यास नुकसान

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन पुन्हा शेतकºयांची चिंता वाढविली आहे. गुरुवारी सकाळी काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. तीन आठवड्यांपासून अधून मधून वातावरण बदलत असल्याने शेतमालाचे नुकसान होण्यासह आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चार-पाच दिवसाआड ढगाळ वातावरण होत आहे. सोबतच पावसाचाही शिडकाव होत आहे. उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा हवामानावर परिणाम होऊन दोन आठवड्यांपासून अशी स्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ५ मार्च रोजी ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ११ मार्च रोजी तशीच स्थिती होती. आता पुन्हा १५ मार्च रोजी सकाळपासूनच शहरात व जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सोबतच जळगाव शहरातील काही भागासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला.बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीचे काम शेतकºयांनी पूर्ण केले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. बाजरी, ज्वारीही काढण्यात आली आहे. मक्याची काढणी मात्र बाकी आहे. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता रेकॉर्डवर घेण्याइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होणार नाही. तसेच बहुतांश पीक काढले गेले आहे. किंवा काढणी सुरू आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाचा त्यावर परिणाम होण्याची भीती नाही. फक्त जोरदार पाऊस आल्यास मात्र या काढणी सुरू असलेल्या पिकावर डाग पडण्याची व ते पीक खराब होण्याची भिती असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस