शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 11:56 IST

रावेरला नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे आजही कायम आहे.

ठळक मुद्देनागरिकांचे हाल थांबेनादोन नवीन पर्यायी ७५ अश्वशक्तीचे मोटार पंप व बिघाड झालेल्या ७५ अश्वशक्तीच्या मोटार पंपाना 'कोरोना'चं रोनं

हाल : दोन नवीन पर्यायी ७५ अश्वशक्तीचे मोटारपंप व बिघाड झालेल्या ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांना 'कोरोना'चं रोनंरावेर : शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या ऐनपूर शिवारात तापीनदी काठी असलेल्या जॅकवेलच्या दोन्ही ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपात सदोष तांत्रिक बिघाड होणे हे आता दरवर्षी नित्त्याचे झाले आहे. असे असतानाही, नवीन दोन ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांची पर्यायी व्यवस्था पालिकेकडून होऊ शकली नाही. गतवर्षी केलेल्या दोन नवीन ट्युबवेलवरून थेट जलशुद्धीकरण प्रकल्पाला संयोजन जोडून कायमस्वरूपी तातडीची उपाययोजना पालिकेकडून केली जाणार आहे. यामुळे गुरुवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.        रावेर शहराला दररोज २५ लाख लीटर्सचा नळपाणीपुरवठा करणार्‍या ऐनपूर जॅकवेलच्या दोन्ही ७५ अश्वशक्तीची क्षमता असलेल्या मोटारपंपांत तीन-चार दिवसांपासून पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा नळपाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यात स्टेशनरोडवरील नागरी वसाहती जास्त प्रभावीत झाल्या आहेत. ही समस्या गतवर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत निर्माण झाली होती. यंदा मात्र तापी नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही बिघाड झाला. दरवर्षी जॅकवेलच्या मोटारपंपात तांत्रिक बिघाड निर्माण होतो. शहराला दररोजच्या २५ लाख लीटर पाण्याची गरज पाहता दोन नवीन ७५ अश्वशक्तीचे मोटारपंप खरेदी करून पर्यायी व्यवस्था करणे नितांत गरजेचे आहे.त्या घटनेला पूर्ण वर्ष लोटले तरी संबंधित कंपनीकडे मागणी नोंदवलेले मोटारपंप न.पा.कडे दाखल होऊ शकले नाही. त्याचे कारण म्हणजे सबमर्सिबल पंप निर्माण करणार्‍या कंपन्यांकडील यांत्रिक कामगार निघून गेल्याचे सांगण्यात येते. वर्षभरापूर्वी मागणी नोंदवली असती तर कंपनी दोन ७५ अश्वशक्तीच्या मोटारपंपांची निर्मिती करू शकली असती.दरम्यान, नगरसेवक सुधीर पाटील व नगरसेवक रंजना गजरे यांनी न्यायालयाच्या आवारा शेजारील नवीन दोन ट्युबवेलचे संयोजन थेट जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीशी जोडून कायमची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत रेटा लावला होता. त्या अनुषंगाने दोन्ही ट्युबवेलचे संयोजन मुख्य जलवाहिनीला जोडण्याची धडक मोहीम सुरू आहे. गुरुवारपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीRaverरावेर