शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

विद्यापीठाविषयी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:06 IST

खुलाशानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक : उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविली प्राप्त तक्रार

जळगाव : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टूडंट कौन्सिल संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती़ या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे़ त्याबाबतचे पत्र दोन्ही संघटनांना रविवारी प्राप्त झाले आहे.कवयित्री बहिणाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभारा विरोधात काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत़ संघटनांकडून विद्यापीठ प्रशासनावर अनेक आरोप झालीत़ त्या आरोपांना फेटाळून लावण्यासाठी विद्यापीठाकडून नुकताच खुलासा करण्यात आला होता़ मात्र, हा खुलासा विद्यार्थी संघटनांनी अमान्य करून सर्व प्रकारांबाबत विद्यापीठाने पुरावे सादर करत संघटनांना चर्चेसाठी बोलवावे, असे आवाहन केले आहे तर काही संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरूध्द विद्यापीठ प्रशासनाला व संघशक्तीला विद्यापीठाबाहेर काढून विद्यापीठ बंद करून आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.मग़़़व्यवहारे यांनी कुणाच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिलाविद्यापीठाने खुलासा दिल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठाला पुरावे सादर करण्याचे मागणी केली आहे. यात त्यांनी विद्यापीठाच्या टीए, डीए संदर्भात असलेले विद्यापीठाचे व महाराष्ट्र शासनाचे नियम वेगवेगळे असतील तर जाहीर करावेत. तसेच मागील कुलसचिव बी.बी. पाटील यांच्या राजीनाम्यासंदर्भात असलेले रेकॉर्ड श्वेत पत्रिकेच्या रूपाने जाहीर करावे, नवीन कुलसचिव नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, वित्त लेखा अधिकारी हे एका संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या ऐवजी विद्यापीठ परिक्षेत्रात एकही लायक अधिकारी किंवा प्राध्यापक का मिळू शकला नाही का? यासोबतच निवृत्त न्यायाधीश व्यवहारे यांनी कोणाच्या जाचाला कंटाळून चौकशी अधिकारी पदाचा राजीनामा दिला, याचादेखील खुलासा करावा. तसेच विद्यापीठात विविध विचारसरणीचे प्राध्यापक, प्राचार्य यांची कोणाच्या आदेशाने प्रमुख समित्यांवर नेमणूक केली आहे, विद्यापीठात कंत्राट कोणाला व कोणाच्या शिफारसीने कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले आहे, विद्यापीठातील अधिकारी गौड यांना पदावरून का काढले आदी प्रश्नांचा पुराव्यानिशी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ कुणाल पवार, फार्मसी स्टूडंट कौन्सिलचे अध्यख भूषण भदाणे, गौरव वाणी, अभिषेक पाटील, विजय पाटील, श्रीनाथ पाटील, उमेश सोनार, सुनील शिंपी, गौरव पाटील, अनिरूध्द सिसोदे, अभिषेक धमाल आदींनी निवेदनाद्वारे केली होती़ तर हीच तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्यावतीने शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली होती़अन् रविवारी झाले पत्र प्राप्तविद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे़ रविवारी राष्ट्रवारी काँग्रेस विद्यार्थी संघटनेला तसे पत्र प्राप्त झाले आहे़ तर तक्रारीची दखल घेवून ती तक्रार पुढील कार्यवाहीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात पाठविण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे़पुराव्यानिशी समोर येऊन खुलासा करावादरम्यान, विद्यापीठाकडून निवड आणि नियुक्त्या या कायदेशीर असल्याचा केलेला खुलासा एनएसयूआय संघटनेने अमान्य केला आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यापीठाने पुराव्यानिशी समोर येऊन खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीयीकृत बँक व जनता सहकारी बँक यामधील गैर ठेवींबद्दल विरोध असल्यामुळे वित्त अधिकारी कराड यांना संघशक्तीने पदावरून काढून टाकले, तर कुलसचिव बी.बी. पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती का घेतली, यासह व्यवस्थापन सदस्य दिलीप रामू पाटील यांची नियुक्ती झाली तेव्हा ते स्वत: जनता बँकेचे डिफॉल्ट होते, मग ते राज्यपाल नियुक्त कसे होऊ शकतात, आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव