शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:08 IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

प्रशांत भदाणे 

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना एकरी, हेक्टरी किंवा ज्याप्रमाणे नुकसान झालं आहे त्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतील, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जळगावात दिलीये.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

कृषिमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, दीड दिवसांच्या पाहणी दौऱ्यात मी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केलीये. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांद्याचे तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मका, गहू आणि हरभऱ्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, त्याची अंमलबजावणी युद्ध पातळीवर सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

एकही शेतकरी वंचित राहणार नाही - 

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मी देतो, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :JalgaonजळगावAbdul Sattarअब्दुल सत्तार