शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईची घोषणा 25 मार्चपर्यंत होईल; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जळगावात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:08 IST

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

प्रशांत भदाणे 

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना एकरी, हेक्टरी किंवा ज्याप्रमाणे नुकसान झालं आहे त्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्याची घोषणा करतील, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जळगावात दिलीये.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

कृषिमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, दीड दिवसांच्या पाहणी दौऱ्यात मी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केलीये. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांद्याचे तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मका, गहू आणि हरभऱ्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, त्याची अंमलबजावणी युद्ध पातळीवर सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

एकही शेतकरी वंचित राहणार नाही - 

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मी देतो, असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :JalgaonजळगावAbdul Sattarअब्दुल सत्तार