शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

सामान्य रुग्णालय कधी होणार सामान्यांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:06 IST

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार येणाºया समस्यांचा अनुभव आता नित्याचा झाला असून सामान्य रुग्णालय कधी सामान्यांचे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथे प्रसूतीसाठी येणाºया महिलांना येथे उपचार उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना इतरत्र हलविणे, खाजगी रुग्णालयात पाठविणे, अरेरावीची भाषा करणे असे अनुभव येथे ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार येणाºया समस्यांचा अनुभव आता नित्याचा झाला असून सामान्य रुग्णालय कधी सामान्यांचे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथे प्रसूतीसाठी येणाºया महिलांना येथे उपचार उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना इतरत्र हलविणे, खाजगी रुग्णालयात पाठविणे, अरेरावीची भाषा करणे असे अनुभव येथे नेहमी येत असतात. आता पुन्हा दोन दिवसांपूर्वी असाच अनुभव जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला आला.नंदगाव येथील सुखाबाई मालचे या महिलेला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी या महिलेची प्रसूती झाली. सिझेरियन झाल्याने या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री एका परिचारिकेने पलंगावरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र प्रसूती होऊन तीनच दिवस झालेले असताना व नवजात बाळही शिशू कक्षात असताना तेथून कसे जाणार असा प्रश्न महिलेला पडला. तरीदेखील परिचारिकेने या महिलेकडे तगादा सुरूच ठेवला. अखेर बुधवारी रात्री बारा वाजता दुसºया महिलेला पलंगावर टाकायचे असल्याने तू पलंगाच्या खाली उतरली तर ठिक नाही फेकून देऊ अशी धमकीच दिली व कक्षातून बाहेर काढून दिले.त्यामुळे कक्षातून बाहेर काढून दिल्याने नाईलाज म्हणून ही महिला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनानजीक असलेल्या व्हरांड्यात खालीच झोपली. सोबत असलेली नातेवाईक महिलाच या प्रसूत महिलेजवळ थांबून होती. रात्री १२ ते सकाळी ११ असे तब्बल ११ तास या सिझेरियन झालेल्या महिलेला उघड्यावर काढावे लागले. त्यामुळे पुन्हा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांच्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.जागा वाढवून प्रश्न मार्गी लावाजिल्हा रुग्णालयात १०० खाटांचा प्रसूती कक्ष आहे. दररोज या ठिकाणी २० ते २५ प्रसूती होतात. त्यात सिझेरियन झाल्यानंतर महिलांना चार ते पाच दिवस उपचारासाठी रुग्णालयातच ठेवावे लागते. त्यामुळे जागेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन बºयाच वेळा एका पलंगावर दोन रुग्णांना टाकावे लागते. आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रुग्णांचा ओघ वाढला असून रुग्णालयातून प्रसूतीनंतर जाणाºया महिलांची संख्या कमी व येणाºया महिलांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेहमीच अशा समस्या उद््भवत आहे. त्यामुळे येथे खाटा वाढवून सामान्यांना पुरेसे उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव