शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

सातव्या वेतन आयोगाच्या नियमांच्या पूर्ततेसाठी समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे; मात्र शासनाने याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे; मात्र शासनाने याबाबत काही अटी व शर्थी लागू केल्या असून, त्या अटींची पूर्तता मनपा प्रशासनाला करावी लागणार आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी मध्यंतरी बैठक घेऊन मनपा कर्मचाऱ्यांना यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केल्यानंतर, आता अटी व शर्थींची पूर्तता करण्यासाठी मनपा आयुक्तांनी तीन सदस्यीय समिती गठित केली असून, याबाबत मनपाची तीन सदस्यीय समिती मनपा आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहे.

शुक्रवारी महापालिकेत मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, श्याम गोसावी, संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व प्रभाग अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला असला तरी मात्र शासनाच्या अटी व शर्थींमुळे हा वेतन आयोग मनपा कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मनपा कर्मचारी सातव्या वेतन आयोगासाठी आग्रही असल्याने मनपा आयुक्तांनीदेखील अटी व शर्थींची पूर्तता करून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

या तीन जणांचा आहे समावेश

अटी व शर्थींची पूर्तता होईल की नाही, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व तयारी यासाठीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. समितीकडून मनपा मालमत्ताकराची वसुली १०० टक्के करण्यासाठी सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या उत्पन्नाची स्थितीदेखील तपासली जाणार आहे. या सर्व बाबींची माहिती घेऊन समिती सदस्य अहवाल तयार करणार असून, हा अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर मनपा आयुक्तांकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

वाढलेला अस्थापना खर्च ठरणार डोकेदुखी

शासनाने घालून दिलेल्या प्रमुख अटी व शर्थींमध्ये मालमत्ताकराची वसुली १०० टक्के करण्याबरोबरच मनपाचा अस्थापना खर्च ३५ टक्के इतका असणे गरजेचे आहे; मात्र सद्यस्थितीत मनपा अस्थापना खर्च हा ५१ टक्के असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मनपाचा अस्थापना खर्च शासनाने निश्चित करून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक आहे. यावर मनपा प्रशासनाकडून आता पुढे काय निर्णय घेण्यात येतो, याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.