शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सातव्या वेतन आयोगाच्या नियमांच्या पूर्ततेसाठी समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे; मात्र शासनाने याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे; मात्र शासनाने याबाबत काही अटी व शर्थी लागू केल्या असून, त्या अटींची पूर्तता मनपा प्रशासनाला करावी लागणार आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी मध्यंतरी बैठक घेऊन मनपा कर्मचाऱ्यांना यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केल्यानंतर, आता अटी व शर्थींची पूर्तता करण्यासाठी मनपा आयुक्तांनी तीन सदस्यीय समिती गठित केली असून, याबाबत मनपाची तीन सदस्यीय समिती मनपा आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहे.

शुक्रवारी महापालिकेत मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, श्याम गोसावी, संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व प्रभाग अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला असला तरी मात्र शासनाच्या अटी व शर्थींमुळे हा वेतन आयोग मनपा कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मनपा कर्मचारी सातव्या वेतन आयोगासाठी आग्रही असल्याने मनपा आयुक्तांनीदेखील अटी व शर्थींची पूर्तता करून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

या तीन जणांचा आहे समावेश

अटी व शर्थींची पूर्तता होईल की नाही, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व तयारी यासाठीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपील पवार या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. समितीकडून मनपा मालमत्ताकराची वसुली १०० टक्के करण्यासाठी सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या उत्पन्नाची स्थितीदेखील तपासली जाणार आहे. या सर्व बाबींची माहिती घेऊन समिती सदस्य अहवाल तयार करणार असून, हा अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर मनपा आयुक्तांकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

वाढलेला अस्थापना खर्च ठरणार डोकेदुखी

शासनाने घालून दिलेल्या प्रमुख अटी व शर्थींमध्ये मालमत्ताकराची वसुली १०० टक्के करण्याबरोबरच मनपाचा अस्थापना खर्च ३५ टक्के इतका असणे गरजेचे आहे; मात्र सद्यस्थितीत मनपा अस्थापना खर्च हा ५१ टक्के असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मनपाचा अस्थापना खर्च शासनाने निश्चित करून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक आहे. यावर मनपा प्रशासनाकडून आता पुढे काय निर्णय घेण्यात येतो, याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.