शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दिलासादायक....आता कोरोना संसर्गाचा उतरता आलेख सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता स्थिरावली असून नवीन रुग्णसंख्येएवढेच रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता स्थिरावली असून नवीन रुग्णसंख्येएवढेच रुग्ण बरेदेखील होत आहे. यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून पॉझिटिव्हिटी दरही कमी झाला असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. असे असले तरी प्रशासनाच्यावतीने सर्व उपाययोजना सुरूच राहणार असून पॉझिटिव्हिटी दर एक अंकी येईपर्यंत सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.ए. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार उपस्थित होते.

आठ ते १० दिवसात रुग्णसंख्या घटणार

कोरोनाच्या या लाटेत उच्चांकी गाठली असून आता रुग्णवाढीचा आलेख वर जाण्यापेक्षा खाली येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोना लाटेची तीव्रता व करण्यात येत असलेल्या उपाययोजना यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिरावली आहे. यात चोपडा येथे रुग्णांची संख्या पाहता आता नियंत्रण मिळविले जात असून केवळ भुसावळ, जळगावातील काही भाग, एरंडोल, जामनेर येथे नियंत्रण आवश्यक असून तेथेदेखील लवकरच रुग्णसंख्या कमी होईल व येत्या आठ ते १० दिवसात जिल्ह्यातील नवीन रुग्णसंख्या व ॲक्टिव्ह रुग्णही कमी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. यात ४ एप्रिलची संख्या पाहता ५ रोजी ती ३० ने कमी झाली. त्यानंतर मध्यंतरी स्थिरावली व आता पुन्हा कमी झाली असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजारावरून १० हजार ५८९वर आली आहे.

वेळेवर उपचार घेतल्यास रेमडेसिविर व ऑक्सिजनचीही गरज नाही

जिल्ह्यात अजूनही अनेक जण वेळेवर तपासणी करीत नाहीत. त्यामुळे प्रकृती खालावून रुग्णसंख्या व त्यातही गंभीरतेचे प्रमाण वाढत आहे. वेळेवर तपासणी केल्यास रेमडेसिविर व ऑक्सिजनचीही गरज पडणार नाही, त्यामुळे सर्वांनी लक्षणे जाणवताच तपासणी करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.

लस दाखल, तीन दिवसात लसीकरण पूर्ण करा

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लस संपली होती. त्यामुळे लसीकरण थांबले होते. आता जिल्ह्यासाठी ४० हजार ९०० युनिट मिळाले असून जिल्ह्यातील १३३ केंद्रांवर लसीकरणाला मंगळवारीच सुरूवात झाली. या उपलब्ध लसींद्वारे तीन दिवसात लसीकरण पूर्ण करायचे असून तशा सूचना देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

नवीन वर्षात आरोग्याची गुढी

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बरे होणारे व नवीन रुग्ण संख्या बरोबरीत असून काही दिवस बरे होणारे जास्त असल्याचे आढळून आले. आता समतोल परिस्थिती आली असून रुग्णवाढीचा आलेख आता उतरता झाला आहे. गुढीपाडव्याला ही सकारात्मक बाब असून आरोग्याची गुढी उभारू व जिल्हावासीयांना पुढील वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

अमळनेरला रेमडेसिविरचा अनावश्यक वापर

जिल्ह्यात दोन हजार रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्यास मागणी पाच हजार इंजेक्शनची होते, असे चित्र असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. यात ज्यांना आवश्यकता नाही त्यांनाही ते दिले जात असून अशाच प्रकारे स्कोअर तीन असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर दिले गेल्याचे अमळनेर येथे आढळून आल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.