शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आओ जाओ घर तुम्हारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:15 IST

रिॲलिटी चेक जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले ...

रिॲलिटी चेक

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. दुसरीकडे जिल्हा, तालुका व इतर राज्यातील येणाऱ्या लोकांची बसस्थानक, रेल्वे स्थानक यासह जिल्हा सीमा आदी ठिकाणी तपासणी केली जात नसल्याचे ‘लोकमत’ ने घेतलेल्या पाहणीत दिसून आले. एकंदरीतच ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून खासगी व सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ९९६ नवे रुग्ण वाढले तर ५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत ८ हजार ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ७३ हजार ५७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत तर १४६२ जणांचा कोरोनाने जीव घेतलेला आहे. जळगाव जिल्हा देशातील टॉप १० मध्ये आलेला असल्याने विशेष खबरदारी घेणे गरजेचे असताना बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबत कुठलीच खबरदारी घेतली जात नाही.

बसस्थानक (फोटो)

नाशिक, औरंगाबादकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही

- गुरुवारी दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानकात ३० मिनिटे थांबून निरीक्षण केले असता नाशिक, औरंगाबाद, धुळे, जामनेर, पाचोरा येथून आलेल्या बसमधील कोणत्याच प्रवाशाची तपासणी झाली नाही. नेहमीपेक्षा गुरुवारी वर्दळ कमी होती.

-कोणत्याच प्रवाशाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पत्ता घेतला गेला नाही किंवा त्यांना क्वारंटाईन केले गेले नाही. प्रवाशांची तपासणीच होत नसल्याने कोणाला कोरोनाचा लागण झाली हे कळू शकत नाही

- बसमधून उतरलेल्या प्रवाशांची तपासणी तर सोडाच स्वत: चालक, किंवा वाहकाने मास्कचा वापर केलेला नव्हता. प्रवाशी बिनधास्त असल्यासारखे वागत होते. बाहेर थांबलेले रिक्षा चालक प्रवाशी मिळविण्याची धडपड करीत होते, पण त्यांनीही मास्क लावलेला नव्हता.

रेल्वेस्थानक (फोटो

मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक

-रेल्वे स्थानकावरही अशीच परिस्थिती होती. मोठ्या संख्येने प्रवाशी रेल्वेतून उतरले, काहींच्या तोंडाला तर मास्कही नव्हते. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची ना वैद्यकिय तपासणी केली जात होती, ना सॅनिटायझेशनही केले जात होते. बिग बाजारच्या दिशेने जिन्याजवळ प्रवाशांची थर्मल स्क्रिनींग केली जात होती तर शिवाजी नगराकडून कुठलीच तपासणी केली जात नव्हती.

-जळगावला उतरणाऱ्यांमध्ये मुंबई, नाशिक व पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. एरव्ही मुंबई, कल्याण ही दोन शहरे हॉटस्पॉट ठरत आहेत, तरी देखील तिकडूनच येणाऱ्या प्रवाशांची फार तितकी काळजी किंवा खबरदारी घेतली गेली नाही.

जिल्हा सीमा (फोटो)

मध्य प्रदेशातून येणाऱ्यांची तपासणीच नाही

- जिल्ह्याच्या सीमा असलेल्या चोपडा, रावेर व मुक्ताईनगर आदी ठिकाणी बाहेर राज्यातून येणाऱ्या कोणत्याच वाहनात बसलेल्या प्रवाशांचा तोंडाला मास्क आहे किंवा त्यांची वैद्यकिय तपासणी केली जात नव्हती.

-थर्मल स्क्रिनींगही करण्यात येत नव्हती. किंबहूना अशी तपासणी करणारी यंत्रणाच काही ठिकाणी नव्हती. मालेगाव, नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी पिंपरखेडजवळ गेल्यावर्षी तपासणी नाके होते, यंदा तशी व्यवस्थाच नाही.

वाढत्या संसर्गात जनता कर्फ्यू लागू

जळगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरु लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी गेल्या आठवड्यात शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुका पातळीवरही हाच निर्णय घेतला जात आहे. त्याशिवाय लसीकरणाची संख्या वाढविण्यावर प्रशासनाने भर दिलेला आहे. आस्थापनांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर कोणतेही आस्थापना सुरु राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव शहरात या नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसून येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखाने फुल्ल झाले आहेत त्यामुळे पर्याय म्हणून कमी लक्षणे असलेल्यांना होमआयसोलेशन मध्ये उपचार केले जात आहेत.