शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आओ जाओ घर तुम्हारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:15 IST

रिॲलिटी चेक जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले ...

रिॲलिटी चेक

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. दुसरीकडे जिल्हा, तालुका व इतर राज्यातील येणाऱ्या लोकांची बसस्थानक, रेल्वे स्थानक यासह जिल्हा सीमा आदी ठिकाणी तपासणी केली जात नसल्याचे ‘लोकमत’ ने घेतलेल्या पाहणीत दिसून आले. एकंदरीतच ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून खासगी व सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ९९६ नवे रुग्ण वाढले तर ५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत ८ हजार ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ७३ हजार ५७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत तर १४६२ जणांचा कोरोनाने जीव घेतलेला आहे. जळगाव जिल्हा देशातील टॉप १० मध्ये आलेला असल्याने विशेष खबरदारी घेणे गरजेचे असताना बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबत कुठलीच खबरदारी घेतली जात नाही.

बसस्थानक (फोटो)

नाशिक, औरंगाबादकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही

- गुरुवारी दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानकात ३० मिनिटे थांबून निरीक्षण केले असता नाशिक, औरंगाबाद, धुळे, जामनेर, पाचोरा येथून आलेल्या बसमधील कोणत्याच प्रवाशाची तपासणी झाली नाही. नेहमीपेक्षा गुरुवारी वर्दळ कमी होती.

-कोणत्याच प्रवाशाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पत्ता घेतला गेला नाही किंवा त्यांना क्वारंटाईन केले गेले नाही. प्रवाशांची तपासणीच होत नसल्याने कोणाला कोरोनाचा लागण झाली हे कळू शकत नाही

- बसमधून उतरलेल्या प्रवाशांची तपासणी तर सोडाच स्वत: चालक, किंवा वाहकाने मास्कचा वापर केलेला नव्हता. प्रवाशी बिनधास्त असल्यासारखे वागत होते. बाहेर थांबलेले रिक्षा चालक प्रवाशी मिळविण्याची धडपड करीत होते, पण त्यांनीही मास्क लावलेला नव्हता.

रेल्वेस्थानक (फोटो

मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक

-रेल्वे स्थानकावरही अशीच परिस्थिती होती. मोठ्या संख्येने प्रवाशी रेल्वेतून उतरले, काहींच्या तोंडाला तर मास्कही नव्हते. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची ना वैद्यकिय तपासणी केली जात होती, ना सॅनिटायझेशनही केले जात होते. बिग बाजारच्या दिशेने जिन्याजवळ प्रवाशांची थर्मल स्क्रिनींग केली जात होती तर शिवाजी नगराकडून कुठलीच तपासणी केली जात नव्हती.

-जळगावला उतरणाऱ्यांमध्ये मुंबई, नाशिक व पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. एरव्ही मुंबई, कल्याण ही दोन शहरे हॉटस्पॉट ठरत आहेत, तरी देखील तिकडूनच येणाऱ्या प्रवाशांची फार तितकी काळजी किंवा खबरदारी घेतली गेली नाही.

जिल्हा सीमा (फोटो)

मध्य प्रदेशातून येणाऱ्यांची तपासणीच नाही

- जिल्ह्याच्या सीमा असलेल्या चोपडा, रावेर व मुक्ताईनगर आदी ठिकाणी बाहेर राज्यातून येणाऱ्या कोणत्याच वाहनात बसलेल्या प्रवाशांचा तोंडाला मास्क आहे किंवा त्यांची वैद्यकिय तपासणी केली जात नव्हती.

-थर्मल स्क्रिनींगही करण्यात येत नव्हती. किंबहूना अशी तपासणी करणारी यंत्रणाच काही ठिकाणी नव्हती. मालेगाव, नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी पिंपरखेडजवळ गेल्यावर्षी तपासणी नाके होते, यंदा तशी व्यवस्थाच नाही.

वाढत्या संसर्गात जनता कर्फ्यू लागू

जळगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरु लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी गेल्या आठवड्यात शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुका पातळीवरही हाच निर्णय घेतला जात आहे. त्याशिवाय लसीकरणाची संख्या वाढविण्यावर प्रशासनाने भर दिलेला आहे. आस्थापनांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर कोणतेही आस्थापना सुरु राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव शहरात या नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसून येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखाने फुल्ल झाले आहेत त्यामुळे पर्याय म्हणून कमी लक्षणे असलेल्यांना होमआयसोलेशन मध्ये उपचार केले जात आहेत.