शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पाल अभयारण्यात आढळले ६ कोटी वर्षांपूर्वीचे कॉलमनार बेसाल्ट खडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल अभयारण्य परिसरात ६ कोटी वर्षांपूर्वींच्या कॉलमनार बेसाल्ट ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल अभयारण्य परिसरात ६ कोटी वर्षांपूर्वींच्या कॉलमनार बेसाल्ट (दगडी खांब)च्या खडक आढळल्याचा दावा चंद्रपूर येथील भूगर्भशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी केला आहे. १४ ऑगस्ट रोजी या भागात पाहणी करत असताना हे खडकाचे खांब आढळून आले आहेत. ६ कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून हे कॉलमनार बेसाल्ट नावाचे नैसर्गिक खडक तयार झाल्याचा दावा प्रा.चोपणे यांनी केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अतिप्राचीन आहे. ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाव्दारे तप्त लाव्हारस जळगाव जिल्हा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत वाहत आला. या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना डेक्कन ट्राप नावाने ओळखले जाते. ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात पश्चिमेकडे ६६०० फुट जाडीचा आहे. महाराष्ट्रात ८० टक्के हा भूभाग या बेसाल्ट खडकापासून बनला आहे. पुढे जवळजवळ ४ कोटी वर्षादरम्यान भूभागाच्या अंतर्गत टक्करमुळे जमीन उंच होत गेली व त्यातूनच सातपुडा पर्वतरांग निर्माण झाल्याचे प्रा.चोपणे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

या भागातही आढळले आहे कॉलमनार बेसाल्ट

पाल अभयारण्याशिवाय याआधी कॉलमनार बेसाल्ट हे कर्नाटकातील सेंट मेरी बेटवर आढळून आले आहेत. यासह राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमध्येदेखील कॉलमनार बेसाल्टची नोंद आहे. त्यात आता जळगाव जिल्ह्यातील पाल येथील खडकाचीदेखील भर पडली आहे.

कशी झाली असेल निर्मिती?

पश्चिम महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी जास्त असून विदर्भात या खडकाची जाडी कमी आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून झीज होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून अनेक नव्या जीवाश्मांचे संशोधन होऊ शकेल. जळगाव परिसरात काही कोटी वर्षांपूर्वी तप्त लाव्हारस वाहात आला. तेव्हा येथील नद्यात तो पडून थंड झाला. त्यामुळे त्याचे आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला व अशा प्रकारचे खांब तयार झाल्याचा दावा प्रा.चोपणे यांनी केला आहे. ऐतिहासिक काळात या खडकांचा वापर मंदिरांच्या बांधकामांसाठी व्हायचा.

या भागांमध्ये केले निरीक्षण

प्रा.सुरेश चोपणे यांनी १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान पाल व यावल अभयारण्यातील पाल, जामन्या, करजपानी, गटऱ्या, लंगडा आंबा, वाकी , टायगर कुटी, गारखेडा व शिर्वेल या परिसरात पाहणी केली. या भागांमध्ये भविष्यात झीज होवून काही ठिकाणी गडप झालेल्या प्राण्यांचे जिवाश्मे मिळण्याचीही शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

कोट...

यावल अभयारण्यात पाल याठिकाणाहून जावे लागते. याठिकाणी निसर्गाचे अदभुत सौंदर्य लाभले आहे. याठिकाणी आढळून येणाऱ्या कॉलमनार बेसाल्टसारख्या दुर्मीळ खडकांचे जतन करण्याची गरज आहे. राजकीय नेते, प्रशासनाने यावल अभयारण्यात जायला सुरक्षित रस्ते आणि सुविधा पुरवून पर्यटन विकासाला चालना देण्याची गरज आहे. मात्र, वन्यजीव व दुर्मीळ भौगोलिक पुराव्यांचे जतन करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले पाहिजेत.

-प्रा.सुरेश चोपणे, सदस्य केंद्रीय वन,पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय.