शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावितरण कार्यालयात आंदोलन करीत अधिकाऱ्याला बांधून ठेवल्याप्रकरणी तसेच पोलीस अधिकाऱ्याला अरेरावी केल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महावितरण कार्यालयात आंदोलन करीत अधिकाऱ्याला बांधून ठेवल्याप्रकरणी तसेच पोलीस अधिकाऱ्याला अरेरावी केल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातच आमदार मंगेश चव्हाण यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना ते जिल्हाधिरी कार्यालय आले आणि तेथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून भाजप नेत्यांनीही आक्रमक होत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांना दोरीने बांधून ठेवले. हा गोंधळ सुरू असताना पोलीसही तेथे दाखल झाले. यावेळी डीवायएसपी कुमार चिंथा यांनाही आमदार चव्हाण यांनी अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून मंगेश चव्हाण यांना पोलीस ताब्यात देणार होते मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भेटणार होते. यासाठी आमदार चव्हाण देखील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. येथे नंतर पोलीसही दाखल झाले व त्यांनी आमदार चव्हाण यांना ताब्यात घेतले.

कायदेशीर कारवाई करणार

पोलिसांनी आमदार चव्हाण यांना ताब्यात घेतल्यानंतर खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे यांनी पोलिसांशी याविषयी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन असून लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे ताब्यात घेणे योग्य नाही असा मुद्दा या भाजप नेत्यांनी मांडला. त्या वेळी कायदेशीर जी कारवाई आहे ती करावीच लागेल असे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी मारहाण केल्याचाही आरोप केला जात असून त्यासाठी फुटेज देखील तपासले जातील असे पोलिसांनी सांगितले.

सरकारकडून दडपशाहीचा प्रयत्न

शेतकरी आज संकटात असून त्याच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे अटक करणे म्हणजे सरकारकडून दडपशाही सुरू आहे, असा आरोप यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी केला. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही व ऊर्जामंत्री सांगतात वीज बिलात सवलत दिली जाईल. यामुळे शेतकरी आशेवर असून सरकारकडूनच शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचेही खासदार पाटील म्हणाले. ३१ मार्च पर्यंत विज बिल भरायचे आहे तर तोपर्यंत वीज पुरवठा खंडित करू नका, सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे गोंधळ निर्माण होत असून यामुळेच शेतकरी संकटात सापडत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांना जबरदस्तीने गाडीत बसविले गेल्याचाही आरोप भाजप नेत्यांनी केला. गोरे इंग्रज गेले आणि हे काळे इंग्रज रुपी सरकार शेतकरी, जनता व लोकप्रतिनिधींवर अन्याय करीत असून याचा आपण तीव्र निषेध करीत असल्याचेही खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू

लोकप्रतिनिधीला जबरदस्तीने ताब्यात घेतले जात असल्याने व शेतकऱ्यांनाही न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावे लागेल असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले. या सरकारने राज्याचे वाटोळे केले असून शेतकऱ्यांनाही ते न्याय देऊ शकत नसल्याने आंदोलने या पुढे सुरूच राहतील असेही यावेळी सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे आंदोलनाचा मुद्दा नाही

जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी भाजप शिष्टमंडळ कोरोना विषयी चर्चा करीत असताना त्यात आमदार मंगेश चव्हाण देखील होते. मात्र या ठिकाणी महावितरण कार्यालयातील आंदोलनाविषयी मुद्दा उपस्थित झाला नाही.