शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

येत्या तीन दिवसात जळगावात थंडीची लाट, पारा ८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:44 IST

१९ किमी प्रतीतास वेगाने वाहताहेत थंड वारे

जळगाव : उत्तरेकडील जम्मु-काश्मिर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये होत असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात थंडीची लाट पसरली आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानात एकाच दिवसात तब्बल ३ अंशाची घट झाली असून, बुधवारी ११ अंश असलेला पारा गुरुवारी ८.४ अंशापर्यंत खाली आला होता. तसेच आगामी तीन दिवस शहरात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.डिसेंबर महिन्यात थंडीची लाट कायम राहीली असून, सरासरी तापमानापेक्षा २ अंशांनी तापमानात घट झाली आहे. दोन दिवस किमान तापमानात वाढ होवून १२ अंशापर्यंत तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाºयांचे प्रमाण वाढल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच उत्तरेकडून येणाºया वाºयांचा वेग १७ ते १९ किमी प्रतीतास या वेगाने वाहत आहेत. त्यामुळे कमाल तापमानातही घट झाली असल्याने दिवसाही गारवा जाणवत आहे. वाºयांचा जोर राजस्थानमधील मेवाड, मध्यप्रदेशातील विंध्य पर्वत लगतच्या भागासह महाराष्टÑातील खान्देश व नाशिक जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळेच थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेतील हवामान तज्ज्ञ निता शशिधरण यांनी दिली.रब्बी पिके तरारलीडिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम राहिल्यामुळे रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत आहे. थंडीमुळे ओसचे प्रमाण वाढल्यामुळे हरभरा, गहूला पाणी भरण्याची गरज पडत नाहीय. तसेच कोरडवाहु जमीनीवरील मक्यालाही थंडीचा लाभ मिळत आहे.हरभºयाला लाभसर्वाधिक फायदा हरभरा पिकाला होत असून, हरभºयामध्ये खार चढत आहे. त्यामुळे हरभºयाचा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज शेतकºयांकडून लावला जात आहे. यासह उशीरा पेरणी झालेल्या पिकांना देखील फायदा होत असल्याची माहिती कृषीतज्ज्ञ हर्षल चौधरी यांनी दिली.केळीच्या कांदेबागला मात्र थंडीमुळे नुकसान होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तर सलग तीन ते चार दिवस किमान पारा ८ अंशापेक्षा कमी राहील्यास हवामान आधारित पिक विमा काढणाºया शेतकºयांना याचा लाभ होणार आहे.पारा आणखीन घसरणारआगामी तीन दिवस उत्तर महाराष्टÑात थंडीची लाट कायम राहणार असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचे तापमान ६ अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागात धुक्याचे प्रमाण देखील वाढले असून, सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके पहायला मिळत आहे. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.उत्तरेत सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील नाशिक, जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये थंडीची पसरली आहे. वाºयांचा वेग अधिक असल्याने थंडीची तीव्रता आणखीन वाढत आहे. आगामी तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, तीन दिवसानंतर किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.-निता शशिधरण, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा

टॅग्स :Jalgaonजळगाव