शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

येत्या तीन दिवसात जळगावात थंडीची लाट, पारा ८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:44 IST

१९ किमी प्रतीतास वेगाने वाहताहेत थंड वारे

जळगाव : उत्तरेकडील जम्मु-काश्मिर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये होत असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात थंडीची लाट पसरली आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानात एकाच दिवसात तब्बल ३ अंशाची घट झाली असून, बुधवारी ११ अंश असलेला पारा गुरुवारी ८.४ अंशापर्यंत खाली आला होता. तसेच आगामी तीन दिवस शहरात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.डिसेंबर महिन्यात थंडीची लाट कायम राहीली असून, सरासरी तापमानापेक्षा २ अंशांनी तापमानात घट झाली आहे. दोन दिवस किमान तापमानात वाढ होवून १२ अंशापर्यंत तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाºयांचे प्रमाण वाढल्याने थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच उत्तरेकडून येणाºया वाºयांचा वेग १७ ते १९ किमी प्रतीतास या वेगाने वाहत आहेत. त्यामुळे कमाल तापमानातही घट झाली असल्याने दिवसाही गारवा जाणवत आहे. वाºयांचा जोर राजस्थानमधील मेवाड, मध्यप्रदेशातील विंध्य पर्वत लगतच्या भागासह महाराष्टÑातील खान्देश व नाशिक जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळेच थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेतील हवामान तज्ज्ञ निता शशिधरण यांनी दिली.रब्बी पिके तरारलीडिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम राहिल्यामुळे रब्बी पिकांना चांगलाच फायदा होत आहे. थंडीमुळे ओसचे प्रमाण वाढल्यामुळे हरभरा, गहूला पाणी भरण्याची गरज पडत नाहीय. तसेच कोरडवाहु जमीनीवरील मक्यालाही थंडीचा लाभ मिळत आहे.हरभºयाला लाभसर्वाधिक फायदा हरभरा पिकाला होत असून, हरभºयामध्ये खार चढत आहे. त्यामुळे हरभºयाचा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज शेतकºयांकडून लावला जात आहे. यासह उशीरा पेरणी झालेल्या पिकांना देखील फायदा होत असल्याची माहिती कृषीतज्ज्ञ हर्षल चौधरी यांनी दिली.केळीच्या कांदेबागला मात्र थंडीमुळे नुकसान होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तर सलग तीन ते चार दिवस किमान पारा ८ अंशापेक्षा कमी राहील्यास हवामान आधारित पिक विमा काढणाºया शेतकºयांना याचा लाभ होणार आहे.पारा आणखीन घसरणारआगामी तीन दिवस उत्तर महाराष्टÑात थंडीची लाट कायम राहणार असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराचे तापमान ६ अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागात धुक्याचे प्रमाण देखील वाढले असून, सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके पहायला मिळत आहे. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावर बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.उत्तरेत सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑातील नाशिक, जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये थंडीची पसरली आहे. वाºयांचा वेग अधिक असल्याने थंडीची तीव्रता आणखीन वाढत आहे. आगामी तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, तीन दिवसानंतर किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.-निता शशिधरण, हवामान तज्ज्ञ, कुलाबा वेधशाळा

टॅग्स :Jalgaonजळगाव