शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जळगावातील ‘गोदावरी’ ते पाळधी शटल सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:37 IST

उमविच्या बस फेºया न वाढविल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने करावा लागतोय रिक्षाद्वारे महामार्गावरून प्रवास

ठळक मुद्देगोदावरी ते पाळधी शटल सेवा दोन महिन्यात बंदउमविसाठी एसटीने सुरु केलेल्या १४ फेºया अपूर्णविद्यार्थ्यांना नाईलाजाने जावे लागत आहे रिक्षाद्वारे

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : विद्यार्थ्यांसाठी गोदावरी कॉलेज ते पाळधी दरम्यान सुरू केलेली शटल बस सेवा अवघ्या दोन महिन्यात बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.उमविसाठी एस.टी.ने केवळ १४ फेºया सुरु केल्या आहेत. मात्र त्या पुरेशा नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षाद्वारे प्रवास करावा लागत आहे.उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात दिवसभरात एसटीच्या १४ फेºया सुरू आहेत. मात्र या फेºया सुरू असूनही उमवि व राष्टÑीय महामार्गालगतच्या महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महामार्गालगत रिक्षा चालकांकडून विद्यापीठ व अन्य महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींनीची रिक्षांमधून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षांमधून प्रवास करावा लागत आहे. गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंद पडली आहे.विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता, विद्यापीठ व जळगाव आगाराकडून जुने बसस्थानक ते उमविपर्यंत बससेवा सुरू गेल्यावर्षी करण्यात आली. सुरुवातीला दिवसभरात ३० फेºया असलेल्या या बससेवेचा सध्या १४ फेºया सुरू आहेत. या रस्त्यावरून दिवसभरात सुमारे १ हजाराहून अधिक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे उमविसाठी सुरू असलेल्या बसफेºया या अपूर्ण पडत असून, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. उमवि, एसएसबीटी महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत वेळोवेळी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी संघटनांकडून बससेवेबाबत आंदोलन करूनदेखील या समस्येकडे कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही.कोंबून भरले जाताहेत विद्यार्थीएसटीकडून १४ फेºया सुरू असल्या तरी अनेकदा वाहक-चालक मिळत नसल्याने काही फेºया रद्द होतात. त्यामुळे एसटीचे नियोजन नसल्याने रिक्षाचालकांना याचा लाभ होत आहे. रिक्षांमधून विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. शिवकॉलनी स्टॉपपासून ते उमवि गेटपर्यंत विद्यार्थ्यांकडून १५ रुपये, तर उमवि मुख्य इमारतीपर्यंत २० रुपये घेतले जातात. तसेच रिक्षाचालक रिक्षांमध्ये तब्बल आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबून भरत असतात. यामुळे महामार्गालगत विद्यार्थ्यांना जीवदेखील धोक्यात टाकावा लागत आहे.अनेकदा रिक्षांमध्ये मुलांसोबत मुलींनादेखील बसविले जाते. यामुळे विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रमाणदेखील वाढले आहे.गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंदएसटी प्रशासनाकडून गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते पाळधी दरम्यान बससेवा सुरू केली होती. जेणेकरून महामार्गालगत येणाºया शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे हाल थांबतील, मात्र अवघ्या दोन महिन्यातच ही सेवा बंद झाली. आॅगस्ट २०१६ मध्ये ही बससेवा सुरू केली होती. एसटीकडून या बससेवेला प्रतिसाद न मिळाल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र एसटीकडून या बससेवेबाबत कु ठलीही माहिती प्रवाशांपर्यंत पुरविण्यात आली नाही.तसेच स्पेशल बससेवा असल्याची कुठलीही ओळख या बसवर देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही बससेवा अवघ्या दोन महिन्यात बंद पडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव