शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील ‘गोदावरी’ ते पाळधी शटल सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:37 IST

उमविच्या बस फेºया न वाढविल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने करावा लागतोय रिक्षाद्वारे महामार्गावरून प्रवास

ठळक मुद्देगोदावरी ते पाळधी शटल सेवा दोन महिन्यात बंदउमविसाठी एसटीने सुरु केलेल्या १४ फेºया अपूर्णविद्यार्थ्यांना नाईलाजाने जावे लागत आहे रिक्षाद्वारे

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : विद्यार्थ्यांसाठी गोदावरी कॉलेज ते पाळधी दरम्यान सुरू केलेली शटल बस सेवा अवघ्या दोन महिन्यात बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.उमविसाठी एस.टी.ने केवळ १४ फेºया सुरु केल्या आहेत. मात्र त्या पुरेशा नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षाद्वारे प्रवास करावा लागत आहे.उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात दिवसभरात एसटीच्या १४ फेºया सुरू आहेत. मात्र या फेºया सुरू असूनही उमवि व राष्टÑीय महामार्गालगतच्या महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महामार्गालगत रिक्षा चालकांकडून विद्यापीठ व अन्य महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींनीची रिक्षांमधून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षांमधून प्रवास करावा लागत आहे. गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंद पडली आहे.विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता, विद्यापीठ व जळगाव आगाराकडून जुने बसस्थानक ते उमविपर्यंत बससेवा सुरू गेल्यावर्षी करण्यात आली. सुरुवातीला दिवसभरात ३० फेºया असलेल्या या बससेवेचा सध्या १४ फेºया सुरू आहेत. या रस्त्यावरून दिवसभरात सुमारे १ हजाराहून अधिक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे उमविसाठी सुरू असलेल्या बसफेºया या अपूर्ण पडत असून, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. उमवि, एसएसबीटी महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत वेळोवेळी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी संघटनांकडून बससेवेबाबत आंदोलन करूनदेखील या समस्येकडे कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही.कोंबून भरले जाताहेत विद्यार्थीएसटीकडून १४ फेºया सुरू असल्या तरी अनेकदा वाहक-चालक मिळत नसल्याने काही फेºया रद्द होतात. त्यामुळे एसटीचे नियोजन नसल्याने रिक्षाचालकांना याचा लाभ होत आहे. रिक्षांमधून विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. शिवकॉलनी स्टॉपपासून ते उमवि गेटपर्यंत विद्यार्थ्यांकडून १५ रुपये, तर उमवि मुख्य इमारतीपर्यंत २० रुपये घेतले जातात. तसेच रिक्षाचालक रिक्षांमध्ये तब्बल आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबून भरत असतात. यामुळे महामार्गालगत विद्यार्थ्यांना जीवदेखील धोक्यात टाकावा लागत आहे.अनेकदा रिक्षांमध्ये मुलांसोबत मुलींनादेखील बसविले जाते. यामुळे विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रमाणदेखील वाढले आहे.गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंदएसटी प्रशासनाकडून गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते पाळधी दरम्यान बससेवा सुरू केली होती. जेणेकरून महामार्गालगत येणाºया शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे हाल थांबतील, मात्र अवघ्या दोन महिन्यातच ही सेवा बंद झाली. आॅगस्ट २०१६ मध्ये ही बससेवा सुरू केली होती. एसटीकडून या बससेवेला प्रतिसाद न मिळाल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र एसटीकडून या बससेवेबाबत कु ठलीही माहिती प्रवाशांपर्यंत पुरविण्यात आली नाही.तसेच स्पेशल बससेवा असल्याची कुठलीही ओळख या बसवर देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही बससेवा अवघ्या दोन महिन्यात बंद पडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव