शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जळगावातील ‘गोदावरी’ ते पाळधी शटल सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:37 IST

उमविच्या बस फेºया न वाढविल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने करावा लागतोय रिक्षाद्वारे महामार्गावरून प्रवास

ठळक मुद्देगोदावरी ते पाळधी शटल सेवा दोन महिन्यात बंदउमविसाठी एसटीने सुरु केलेल्या १४ फेºया अपूर्णविद्यार्थ्यांना नाईलाजाने जावे लागत आहे रिक्षाद्वारे

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.५ : विद्यार्थ्यांसाठी गोदावरी कॉलेज ते पाळधी दरम्यान सुरू केलेली शटल बस सेवा अवघ्या दोन महिन्यात बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.उमविसाठी एस.टी.ने केवळ १४ फेºया सुरु केल्या आहेत. मात्र त्या पुरेशा नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षाद्वारे प्रवास करावा लागत आहे.उत्तर महाराष्टÑ विद्यापीठात दिवसभरात एसटीच्या १४ फेºया सुरू आहेत. मात्र या फेºया सुरू असूनही उमवि व राष्टÑीय महामार्गालगतच्या महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महामार्गालगत रिक्षा चालकांकडून विद्यापीठ व अन्य महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींनीची रिक्षांमधून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रिक्षांमधून प्रवास करावा लागत आहे. गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंद पडली आहे.विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता, विद्यापीठ व जळगाव आगाराकडून जुने बसस्थानक ते उमविपर्यंत बससेवा सुरू गेल्यावर्षी करण्यात आली. सुरुवातीला दिवसभरात ३० फेºया असलेल्या या बससेवेचा सध्या १४ फेºया सुरू आहेत. या रस्त्यावरून दिवसभरात सुमारे १ हजाराहून अधिक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे उमविसाठी सुरू असलेल्या बसफेºया या अपूर्ण पडत असून, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. उमवि, एसएसबीटी महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत वेळोवेळी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. तसेच विद्यार्थी संघटनांकडून बससेवेबाबत आंदोलन करूनदेखील या समस्येकडे कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही.कोंबून भरले जाताहेत विद्यार्थीएसटीकडून १४ फेºया सुरू असल्या तरी अनेकदा वाहक-चालक मिळत नसल्याने काही फेºया रद्द होतात. त्यामुळे एसटीचे नियोजन नसल्याने रिक्षाचालकांना याचा लाभ होत आहे. रिक्षांमधून विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. शिवकॉलनी स्टॉपपासून ते उमवि गेटपर्यंत विद्यार्थ्यांकडून १५ रुपये, तर उमवि मुख्य इमारतीपर्यंत २० रुपये घेतले जातात. तसेच रिक्षाचालक रिक्षांमध्ये तब्बल आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबून भरत असतात. यामुळे महामार्गालगत विद्यार्थ्यांना जीवदेखील धोक्यात टाकावा लागत आहे.अनेकदा रिक्षांमध्ये मुलांसोबत मुलींनादेखील बसविले जाते. यामुळे विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रमाणदेखील वाढले आहे.गोदावरी ते पाळधीची शटल बससेवा महिन्यातच बंदएसटी प्रशासनाकडून गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय ते पाळधी दरम्यान बससेवा सुरू केली होती. जेणेकरून महामार्गालगत येणाºया शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाºया विद्यार्थ्यांचे हाल थांबतील, मात्र अवघ्या दोन महिन्यातच ही सेवा बंद झाली. आॅगस्ट २०१६ मध्ये ही बससेवा सुरू केली होती. एसटीकडून या बससेवेला प्रतिसाद न मिळाल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र एसटीकडून या बससेवेबाबत कु ठलीही माहिती प्रवाशांपर्यंत पुरविण्यात आली नाही.तसेच स्पेशल बससेवा असल्याची कुठलीही ओळख या बसवर देण्यात आली नव्हती. त्यामुळे ही बससेवा अवघ्या दोन महिन्यात बंद पडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव