शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

महापालिकेच्या रिक्त २ हजार जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 11:31 IST

गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली. 

जळगाव : महापालिकेतील ३२०० कर्मचाऱ्यांची संख्या आता १ हजारपर्यंत खाली आली असून, गेल्या अनेक वर्षांमध्ये महापालिकेतील २२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिकेतील रिक्त जागांमुळे मनपा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक वर्षांपासून महापालिकेतील रिक्त जागा भरण्याबाबत आकृतीबंधाचा शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला आता शासनाकडून लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील रिक्त असलेल्या २१३७ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्यासह उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली. 

नगरविकास मंत्रालयाकडून मनपा प्रशासनाने पाठविलेल्या आकृतीबंधाच्या प्रस्तावात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करून, सोमवारी नवीन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना नगरविकास मंत्रालयाकडून महापालिकेला देण्यात आल्याचीही माहिती महापौरांनी दिली. सोमवारी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, प्रस्ताव पाठविल्यानंतर आठवडाभराच्या आता आकृतीबंधाचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे मनपात लवकरच २ हजार जागांची ‘जम्बो भरती’ होण्याची शक्यता आहे.

९६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचाही मार्ग मोकळामहापालिकेतील ९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. त्यात या कर्मचाऱ्यांची शिक्षणाची अट शिथील करून, त्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महापालिकेतील अनुकंपाधारकांच्या विषयावर नगरविकास मंत्रालयाने महापालिकेवरच निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुकंपाधारकांचा विषय हा स्थानिक पातळीवर घेण्याचा विषय असून, मंत्रालयापर्यंत आणण्याचा हा विषय नसल्याचेही नगरविकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आकृतीबंध, अनुकंपाधारकांचा विषय व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असलेला आकृतीबंधाचा विषय आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: या विषयात लक्ष घालून, गुरुवारी बैठक घेतली. तसेच मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आकृतीबंधासह, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे व अनुकंपाधारकांच्या दृष्टीने देखील निर्णय होणार आहे.- जयश्री महाजन, महापौर

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका