शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:02 IST

भाजप जिल्हाध्यक्ष जावळे : ‘महाविकास’ आघाडी ‘महाभकास’ झाल्याची टीका

जळगाव : राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे २५ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयांसमोर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका सुरु असल्याचे ते म्हणाले.जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या संदर्भात रविवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी जावळे यांच्यासह महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. विजय धांडे, मनोज भांडारकर उपस्थित होते. या प्रसंगी जावळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करीत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.सातबारा अद्यापही कोरा नाहीभाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला असल्याचा आरोप हरिभाऊ जावळे यांनी केला.ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला असून सरसकट कर्जमाफीची घोषणाही हवेत विरल्याने शेतकºयांचा सातबारा अद्यापही कोरा झाला नसल्याचे जावळे म्हणाले. सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकºयांची सरसकट फसवणूक असल्याची टीका त्यांनी केली.चांगली कामे थांबविण्याचा धडाकाभाजप सरकारने विविध कामांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सुरू झालेली चांगली कामेही थांबविण्याचा धडाका राज्य सरकारने लावला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पावसाळ््यात दमदार पाऊस झाला व शेततळ््यांचीे कामे चांगलीे झाल्याने रब्बी हंगाम चांगला आला. हरभरा चांगला आला असला तरी खरेदी केंद्र नाही, तूर खरेदीही केवळ साडे तीन क्विंटलपर्यंत केली जात आहे.राष्ट्र हिताला बाधासीएए वरून तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू असून याद्वारे राष्ट्र हिताला बाधा पोहचविण्याचे कामदेखील राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जावळे यांनी केला.महिला अत्याचारात वाढराज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून हिंगणघाटच्या घटनेनंतरही महिलांवरील अत्याचार थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असून पोलिसांचा धाक संपल्याची टीका जावळे यांनी केली. तीन पक्ष मिळून स्थापन झालेले हे सरकार म्हणजे ‘तिºह्या’ रंगाचे सरकार आहे, असा उल्लेख त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव