शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:02 IST

भाजप जिल्हाध्यक्ष जावळे : ‘महाविकास’ आघाडी ‘महाभकास’ झाल्याची टीका

जळगाव : राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे २५ रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयांसमोर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडून चांगली कामे थांबविण्याचा धडाका सुरु असल्याचे ते म्हणाले.जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या संदर्भात रविवारी पत्रकार परिषद झाली. या वेळी जावळे यांच्यासह महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. विजय धांडे, मनोज भांडारकर उपस्थित होते. या प्रसंगी जावळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करीत भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.सातबारा अद्यापही कोरा नाहीभाजपचा विश्वासघात करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला असल्याचा आरोप हरिभाऊ जावळे यांनी केला.ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांना आश्वासनांचा विसर पडला असून सरसकट कर्जमाफीची घोषणाही हवेत विरल्याने शेतकºयांचा सातबारा अद्यापही कोरा झाला नसल्याचे जावळे म्हणाले. सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकºयांची सरसकट फसवणूक असल्याची टीका त्यांनी केली.चांगली कामे थांबविण्याचा धडाकाभाजप सरकारने विविध कामांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सुरू झालेली चांगली कामेही थांबविण्याचा धडाका राज्य सरकारने लावला असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पावसाळ््यात दमदार पाऊस झाला व शेततळ््यांचीे कामे चांगलीे झाल्याने रब्बी हंगाम चांगला आला. हरभरा चांगला आला असला तरी खरेदी केंद्र नाही, तूर खरेदीही केवळ साडे तीन क्विंटलपर्यंत केली जात आहे.राष्ट्र हिताला बाधासीएए वरून तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू असून याद्वारे राष्ट्र हिताला बाधा पोहचविण्याचे कामदेखील राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप जावळे यांनी केला.महिला अत्याचारात वाढराज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून हिंगणघाटच्या घटनेनंतरही महिलांवरील अत्याचार थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असून पोलिसांचा धाक संपल्याची टीका जावळे यांनी केली. तीन पक्ष मिळून स्थापन झालेले हे सरकार म्हणजे ‘तिºह्या’ रंगाचे सरकार आहे, असा उल्लेख त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव