शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या निधीचा दावा, मात्र विकास झाला तरी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:03 IST

रोटरीतर्फे चर्चासत्र : त्रासाला कोण जबाबदार ? : प्रश्न अनुत्तरीतच

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधीचा निधी आल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. मात्र, या कोट्यवधीच्या निधीतून विकास झाला तरी कुठे ? असा प्रश्न रविवारी रोटरी वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आयोजित ‘जळगावकरांच्या त्रासाला कोण जबाबदार ?’ या विषयावरील चर्चासत्रात उपस्थित नागरिकांनी केला. मात्र, त्रासापासून मुक्तता होईल, असे उत्तर मिळू शकले नाही.शहरातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगावकरांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार आहे तरी कोण ? याबाबत नागरिकांना उत्तर मिळावे यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर सुशिलकुमार राणे, किशोर ढाके, गनी मेमन, अ‍ॅड.सुरज जहांगीर, सुनील सुखाणी आदी उपस्थित होते.२८ कोटी आले सुविधांचा पत्ताच नाहीउद्योजक किशोर ढाके म्हणाले की, २५ वर्षानंतर पहिल्यादांच एमआयडीसीच्या विकासाठी २८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र, त्यातून कोणत्या समस्या सोडविण्यात आला ? हे न कळण्यापलीकडे असल्याचे सांगितले. शहरातील मुख्य चौकात सिग्नल व्यवस्था आहे. मात्र, ती अनेकदा बंद असते ती व्यवस्था जर सुरु राहिली असती तर अनिल बोरोले यांचा मृत्यू कदाचित झाला नसता. अमृत योजनेमुळे रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्याची दुरुस्ती होत नसल्याचे ढाके यांनी सांगितले.३५० कोटी वसुल करून दाखवतोगाळ्यांबाबत दीपककुमार गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर आयुक्तांनी हा प्रश्न टाळल्यानंतर गुप्ता यांनी १५ दिवस आयुक्त बनवा आपण गाळेधारकांकडून ३५० कोटींची वसुली करून दाखवतो असा प्रस्ताव दिला. त्यावर हा चित्रपटाचा विषय नसून तसा नियम नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर अ‍ॅड.राहुल लाठी यांनी समस्या सोडवू शकत नसेल तर मनपा बरखास्त करुन टाकावी असे सांगितले.आयुक्तांनी सांगितल्या मनपाच्या कमजोर व मजबूत बाजु ; गाळ्यांबाबत भाष्य नाही- आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी मनपाच्या कमजोर बाजू व मजबूत बाजू यावेळी मांडल्या., सध्या मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असून मनपात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.- महिने-दोन महिन्यात शहराच्या समस्या सोडवायच्या असतील तर माझ्याकडे जादुचा दिवा द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील काही वर्षात शहरात पाणी पुरवठा, मलनिस्सारण योजनेसह पिंप्राळा व शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम झाल्यामुळे मोठ्या अडचणी दुर होणार असल्याचे सांगितले.- सफाईचा ठेका देण्यात आला असून, आॅगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यात मक्तेदाराकडून काम सुरु झाल्यानंतर कचºयाची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. तर एमआयडीसी च्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, गाळ्यांचा प्रश्नांबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे सांगत आयुक्तांनी गाळ्याचा प्रश्नाला बगल दिल्याचेच दिसून आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव