शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:48 IST

जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसाने सरासरीची पन्नासी गाठली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. वाघूर ...

जळगाव : जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसाने सरासरीची पन्नासी गाठली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. वाघूर धरणात ८२ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे जळगाव व जामनेर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न यंदाही मिटणार आहे.जिल्ह्यातील मंगरूळ, अग्नावती, सुकी, हिवरा या चार प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा झाला आहे. ही चारही धरणे ओसंडून वाहत आहेत. यासह बोरी, गुळ, तोंडापूर या प्रकल्पांमध्येही जलसाठा शंभरीकडे वाटचाल करत आहे. यामुळे अनेक तालुक्यांमध्ये ही यंदा सुजलाम-सुफलाम स्थिती पहायला मिळणार आहे.५२ टक्के पाऊसजिल्ह्यात यंदा २६ जुलैपर्यंत ५२ टक्के पाऊस झाला आहे. अनेक वर्षांच्या तुलनेत जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी जास्त असली तरी जिल्ह्यात यंदा झालेला पाऊस सलग नसून, तुटक स्वरुपाचा आहे. तसेच एका तालुक्यात पाऊस झाल्यास दुसऱ्या तालुक्यात हा पाऊस होत नाही असेच चित्र सध्या दिसून येत आहे. हवामान बदलामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातला हा एक परिणाम म्हणावा लागेल असे जाणकारांचे मत आहे.गिरणा फुल्ल झाल्यास मिळणार पाच आवर्तने ?-गिरणा धरणाच्या जलसाठ्यात देखील वाढ झााली असून, गिरणा धरणात ४२ टक्के जलसाठा झाला आहे. जुलै महिन्यातच ही स्थिती झाल्यामुळे चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव व जळगाव तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांनाही यामुळे फायदा होणार आहे. तसेच सप्टेंबरअखेरपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा ८० पारही गेला तरी गिरणेतून चार ते पाच आवर्तने मे महिन्यापर्यंत मिळतात. त्यामुळे गेल्या वर्षांप्रमाणे गिरणा काठच्या गावांचाही पिण्याचा पाण्यासह शेतीसाठीचा प्रश्न मिटणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव