शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतनगर, कराब, टोणगावला सिटी सर्व्हे लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 16:03 IST

भडगाव यशवंतनगर, कराब, टोणगाव, वडधे येथील नागरिकांच्या हक्काच्या जागा सिटी सर्व्हेत आली आहे.

ठळक मुद्देदिलासा : सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याचे फलित.

लोकमत न्यूज नेटवर्क

भडगाव : भडगाव यशवंतनगर, कराब, टोणगाव, वडधे येथील नागरिकांच्या हक्काच्या जागेला सिटी सर्व्हे होण्यासाठी अनेक दिवसांपासून नरेंद्र पाटील यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेत मंत्रालय कक्ष अधिकारी उदय सार्दळ यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच योग्य कार्यवाही करण्यासाठी विनंती केली असल्याने आता नागरिकांच्या हक्काचे व स्वःमालकीचे घरकूल व बँक कर्ज आदी कामे लवकरच मार्गी लागू शकणार आहेत.

शहरातील यशवंतनगर, कराब, टोणगाव, वडधे येथील नागरिक १९६९ पासून वास्तव्य करत असून त्यांना हक्काच्या जागा असूनही सिटी सर्व्हेला नोंद नसल्याने आजतागायत त्यांना शासनाच्या घरकूल, प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजनांचा ठोस लाभ घेता येत नव्हता. शिवाय व्यवसाय व घर बांधकामासाठी बँक कर्जही मिळत नव्हते. अनेक शासकीय योजनांना मुकावे लागत होते. अनेक नागरिकांनी जीवनमान उंचावत नसल्याने आर्थिक व सामाजिक संकटात सापडून जीवन संपविले आहे. भोगवटाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसांना त्याचा मालकी हक्कही मिळत नाही.

नागरिकांना सर्व योजनांचा तत्काळ लाभ मिळून, हक्काची जागा सिटी सर्व्हे व्हावी याकरिता २०१६पासून शासनाच्या विविध विभाग कार्यालय अधीक्षक गावठाण जमाबंदी आयुक्त, पुणे, उपसंचालक भूमिअभिलेख, नाशिक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जळगाव, उपअधीक्षक भूमी अभिलेख, भडगाव, नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई, नगरविकास विभाग-२, मंत्रालय मुंबई, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे, जिल्हाधिकारी, जळगाव, मुख्याधिकारी, न.पा. भडगाव यांच्याकडे नरेंद्र पाटील सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहे. दरम्यान मागीलवर्षी जनआंदोलन उभारून नागरिकांच्या सह्यांचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

काम मोठे असल्याने सर्वच कार्यालय एकमेकांना बोट दाखवण्यात वेळ घेत असल्याने त्यांच्याकडे नरेंद्र पाटील यांनी माहिती अधिकारात जळगाव जिल्हाधिकारी, आयुक्त नाशिक, आयुक्त पुणे, सचिव मंत्रालय मुंबई, मुख्यमंत्री कार्यालय व थेट पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालय व संबंधित विभागाने घेऊन मंत्रालय कक्ष अधिकारी उदय सार्दळ यांच्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यवाहीची विनंती केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या प्रशासकीय स्तरातून लवकरच सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या हक्कासाठी अनेक वर्षापासून शासन दरबारी भांडत आहे. त्याची आता कुठे दखल घेण्यात येत आहे. याबाबत आगामी काळात नागरिकांना हक्काच्या जागेवर सिटी सर्वेसाठी व पुढे २०२२ पर्यंत चालणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

-नरेंद्र रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, भडगाव.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावMuncipal Corporationनगर पालिका