शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त नागरिक अखेर उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या ९ वर्षांपासून मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या ९ वर्षांपासून मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त असलेले नागरिक अखेर रस्त्यावर उतरले. गुरुवारी चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील रहिवाशांनी हा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्याची मागणी करीत, प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या घंटागाड्या व कचऱ्याने भरून जाणारे ट्रॅक्टर रोखून आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महापौर जयश्री महाजन व उपमहापौरांनी रहिवाशांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणावर पडलेल्या कचऱ्याला आग लागून त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक या समस्येने त्रस्त आहे. गुरुवारी या नागरिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या घंटागाड्या व ट्रॅक्टर अडवून चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील रहिवाशांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर ट्रॅक्टर व घंटागाड्यांचा लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत मनपा अधिकारी व पदाधिकारी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय या भागातील रहिवाशांनी घेतला.

निवेदन, आंदोलन करूनही झाला नाही उपयोग

रहिवाशांनी मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे या भागातील नागरिकांना घरे विक्री करण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा आंदोलने करून, मनपा प्रशासनाला निवेदने देऊनदेखील कोणतीही दखल मनपा प्रशासन घ्यायला तयार नसल्याने एकही वाहन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊ न देण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. महापौर व मनपा प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला.

महापौर, उपमहापौरांनी दिली भेट

रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तासाभरानंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन रहिवाशांची भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत, घनकचरा प्रकल्प याठिकाणाहून इतरत्र ठिकाणी करण्याची मागणी केली. अशाचप्रकारे विषारी धुराचा सामना केला तर याठिकाणचे रहिवासी आजाराने मरतील किंवा घरे विकतील अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे महापौरांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून, यावर तोडगा काढण्याचा सूचना दिल्या. तसेच चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचेही आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.