शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त नागरिक अखेर उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या ९ वर्षांपासून मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या ९ वर्षांपासून मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुराने त्रस्त असलेले नागरिक अखेर रस्त्यावर उतरले. गुरुवारी चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील रहिवाशांनी हा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्याची मागणी करीत, प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या घंटागाड्या व कचऱ्याने भरून जाणारे ट्रॅक्टर रोखून आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महापौर जयश्री महाजन व उपमहापौरांनी रहिवाशांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणावर पडलेल्या कचऱ्याला आग लागून त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक या समस्येने त्रस्त आहे. गुरुवारी या नागरिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाऱ्या घंटागाड्या व ट्रॅक्टर अडवून चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील रहिवाशांनी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे या रस्त्यावर ट्रॅक्टर व घंटागाड्यांचा लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत मनपा अधिकारी व पदाधिकारी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय या भागातील रहिवाशांनी घेतला.

निवेदन, आंदोलन करूनही झाला नाही उपयोग

रहिवाशांनी मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे या भागातील नागरिकांना घरे विक्री करण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा आंदोलने करून, मनपा प्रशासनाला निवेदने देऊनदेखील कोणतीही दखल मनपा प्रशासन घ्यायला तयार नसल्याने एकही वाहन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊ न देण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. महापौर व मनपा प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला.

महापौर, उपमहापौरांनी दिली भेट

रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तासाभरानंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन रहिवाशांची भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत, घनकचरा प्रकल्प याठिकाणाहून इतरत्र ठिकाणी करण्याची मागणी केली. अशाचप्रकारे विषारी धुराचा सामना केला तर याठिकाणचे रहिवासी आजाराने मरतील किंवा घरे विकतील अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. रहिवाशांच्या मागणीप्रमाणे महापौरांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून, यावर तोडगा काढण्याचा सूचना दिल्या. तसेच चंदू अण्णा नगर व पवार पार्कमधील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचेही आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.