शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथील कुंटणखान्यातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 18:05 IST

कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे.

ठळक मुद्देहतनूर विभागाकडून जेसीबीद्वारा घरे उद्ध्वस्त३०-३५ वर्षांपासून सुरू होता कुंटणखाना

चोपडा, जि.जळगाव : येथील धरणगाव रस्त्यावर हतनूर उजव्या कालव्याला लागून असलेल्या हतनूर प्रकल्पाच्या जागेवरील कुंटणखाना चालत असलेल्या भागातील अतिक्रमित झोपड्यांवर संक्रांत आली आहे. हतनूर विभागाने जेसीबीद्वारे हे अतिक्रमण मंगळवारी काढले.हतनूर प्रकल्पाच्या जमिनीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अतिक्रमित घरे, झोपड्या उभारून कुंटणखाना सुरू होता. याविषयी वारंवार विविध विभागांकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन काही कारवाया यापूर्वीही केल्या आहेत. परंतु १४ जानेवारी रोजी हतनूर पाटबंधारे विभागाच्या चोपडा कार्यालयाने कालव्या लगत असलेल्या या जमिनीवरील अतिक्रमण केलेली २५ घरे जेसीबी लावून जमीनदोस्त करून सुमारे १० हजार चौरस फूट जागा मोकळी केली. कुंटण खाण्याच्या अतिक्रमित झोपड्यांवर आत्मा विभागाकडून संक्रांत आली.हतनूर पाटबंधारे विभागातर्फे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वेश्यांना यापूर्वी तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी जागा खाली न केल्याने दंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याचे शाखा अभियंता पी. बी.पाटील यांनी सांगितले. या कारवाईत उपविभागीय अभियंता ए. जे.निकम, शाखा अभियंता पी.आर. सोनवणे यांच्यासह २० कर्मचारी उपस्थित होते.याकामी स पो.नि. मनोज पवार यांच्यासह २६ पुरुष व ३ महिला पोलीस कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.जागेचे प्रतिदिन भाडे रुपये एक हजार@वेश्या व्यवसायासाठी बाहेरून आलेल्या महिलांनी याठिकाणी उभारलेल्या झोपड्यांंमध्ये व्यवसाय सुरू केला होता. यातील बºयाच वेश्यांना झोपड्या, पत्र्याची घरे ही स्थानिक लोकांनी बांधून दिली. त्यांना प्रति दिवस एक हजार रुपये भाडे द्यावे लागत होते, असेही घटनास्थळी समजले. यामागे मोठे अर्थकारण होत असल्याने तसेच गुंडगिरी फोफावत असल्याने त्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.कुंटणखान्यातील महिला घरातील साहित्य काढून वाचविण्याचा प्रयत्न करत होत्या. काही महिलांनी रिक्षामध्ये घरातील साहित्य टाकून दुसरीकडे हलवण्यासाठी धावपळ केली. मात्र हतनूर विभागाकडून तोडण्यात आलेली घरांचे पत्रे जेसीबीने संपूर्ण नेस्तनाबूत करण्यात आले. केवळ भंगारमध्ये ते पत्रे विकले जातील, या स्वरूपाचे करून पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, यासाठी हतनूर विभागाचे अधिकारी सतर्क राहणार आहेत.गेल्या ३५-४० वर्षांपासून ही वस्ती या ठिकाणी वसलेली होती. यामुळे अनेक घटनाही घडलेल्या होत्या. परंतु आता या विभागाने पोलीस संरक्षणात केलेल्या थेट कारवाईमुळे आता ही वस्ती मात्र याठिकाणी नष्ट करण्यात आलेली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा