शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

चोपड्याच्या रत्नावतीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला ...

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला या नदीचे रौद्ररूप चोपडा शहरवासीयांनी अनुभवले आहे.

सांडपाणी व टाकाऊ वस्तू थेट नदीत

या नदीत सर्व रहिवासी घरांचे सांडपाणी गटारीमार्फत येत असते. तसेच याच नदीच्या पात्रात मासे व मटण विक्रेते उर्वरित टाकाऊ अवशेष टाकत असतात. भाजीपाला विक्रेते भाज्यांचे टाकाऊ व सडलेला भाग टाकतात. तसेच नागरिकही या नदीपात्रात प्लास्टिकचा केरकचरा टाकत असतात आणि अनेक नागरिक याच नदीच्या पात्रात प्रातर्विधीसाठी सकाळी येत असतात. म्हणून या रत्नावती नदीचे पात्र प्रदूषित बनले आहे. पावसाळ्यातील चांगला पाऊस पडल्यानंतर या नदीला पूर आल्यानंतर पात्र नदीच्या पाण्यानेच स्वच्छ होत असते.

नाल्यांचे पाणी येते नदीत

सर्व नाले याच नदीत येत असल्याने, नदीनाल्यांमधून बहुतांश कचरा हा या नदीपात्रात येत असतो. अरुणनगरमधून येणारा नाला, रामपुरा भागातून येणाऱ्या नाल्यामार्फत सर्वच घाण पाणी या नदीपात्रात येत असते. म्हणून या नदीचे पात्र हे प्रदूषित बनले आहे. यामुुळे पावसाळ्यात शहरात रोगराई पसरू शकते. ही नदी पहाडातून येत असल्याने प्रथम पुरात वृक्ष तोडून टाकले अवशेष या नदीच्या पाण्यासोबत वाहून येतात. हा काडी कचरा या नदीवर असलेल्या लहान पुलांच्या बोगद्यात अडकतात आणि तेथून पाणी तुंबते व शहरात पाणी घुसण्याची शिरण्याची शक्यता असते.

स्वच्छ भारत योजनेंतर्गत येथील पालिकेतील आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी दोन वर्षांपूर्वी एक दिवस येथील रत्नावती नदीपात्रातील घाणीची साफसफाई मोहीम राबवली होती. या विषयाकडे नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी लक्ष देऊन साफसफाई करण्यासाठी काहीअंशी प्रयत्न केले; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने कहर केल्याने नदी स्वच्छ करून गाळ कढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

५० लाखांची तरतूद

दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रत्नावती नदीचे संवर्धन व्हावे यासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नदीतून गाळ काढला जात नसून केवळ काटेरी झाडे-झुडपे मुळासकट काढली जात असतात. शहरात पाणी शिरू नये म्हणून या नदीच्या पात्राला खोल करून वाहणाऱ्या पाण्याला दिशा दिली जाते; परंतु सध्या खोलीकरण केले जात नसल्याने नदीपात्र अरुंद झाले आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने नदीला नदीचे रूप शिल्लक राहिलेले नाही. ही नदी गटारगंगा बनली आहे. या नदीपात्रात दोन्ही थडीला काँक्रीट रस्ता बनवून सुशोभीकरण करता येऊ शकते. मात्र, या विषयांची सत्ताधारी आणि विरोधकांना विसर पडला आहे. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार तरी खर्च होतो काय? याबाबत साशंकता आहे.

०५सीडीजे ६