शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

चोपड्याच्या रत्नावतीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला ...

ही नदी सातपुडा पर्वत रांगांमध्ये उगम पावली आहे. खूप लांबून या नदीत पाणी येत असते. ५ जुलै २००६ ला या नदीचे रौद्ररूप चोपडा शहरवासीयांनी अनुभवले आहे.

सांडपाणी व टाकाऊ वस्तू थेट नदीत

या नदीत सर्व रहिवासी घरांचे सांडपाणी गटारीमार्फत येत असते. तसेच याच नदीच्या पात्रात मासे व मटण विक्रेते उर्वरित टाकाऊ अवशेष टाकत असतात. भाजीपाला विक्रेते भाज्यांचे टाकाऊ व सडलेला भाग टाकतात. तसेच नागरिकही या नदीपात्रात प्लास्टिकचा केरकचरा टाकत असतात आणि अनेक नागरिक याच नदीच्या पात्रात प्रातर्विधीसाठी सकाळी येत असतात. म्हणून या रत्नावती नदीचे पात्र प्रदूषित बनले आहे. पावसाळ्यातील चांगला पाऊस पडल्यानंतर या नदीला पूर आल्यानंतर पात्र नदीच्या पाण्यानेच स्वच्छ होत असते.

नाल्यांचे पाणी येते नदीत

सर्व नाले याच नदीत येत असल्याने, नदीनाल्यांमधून बहुतांश कचरा हा या नदीपात्रात येत असतो. अरुणनगरमधून येणारा नाला, रामपुरा भागातून येणाऱ्या नाल्यामार्फत सर्वच घाण पाणी या नदीपात्रात येत असते. म्हणून या नदीचे पात्र हे प्रदूषित बनले आहे. यामुुळे पावसाळ्यात शहरात रोगराई पसरू शकते. ही नदी पहाडातून येत असल्याने प्रथम पुरात वृक्ष तोडून टाकले अवशेष या नदीच्या पाण्यासोबत वाहून येतात. हा काडी कचरा या नदीवर असलेल्या लहान पुलांच्या बोगद्यात अडकतात आणि तेथून पाणी तुंबते व शहरात पाणी घुसण्याची शिरण्याची शक्यता असते.

स्वच्छ भारत योजनेंतर्गत येथील पालिकेतील आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी दोन वर्षांपूर्वी एक दिवस येथील रत्नावती नदीपात्रातील घाणीची साफसफाई मोहीम राबवली होती. या विषयाकडे नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी लक्ष देऊन साफसफाई करण्यासाठी काहीअंशी प्रयत्न केले; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने कहर केल्याने नदी स्वच्छ करून गाळ कढण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

५० लाखांची तरतूद

दरम्यान गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रत्नावती नदीचे संवर्धन व्हावे यासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नदीतून गाळ काढला जात नसून केवळ काटेरी झाडे-झुडपे मुळासकट काढली जात असतात. शहरात पाणी शिरू नये म्हणून या नदीच्या पात्राला खोल करून वाहणाऱ्या पाण्याला दिशा दिली जाते; परंतु सध्या खोलीकरण केले जात नसल्याने नदीपात्र अरुंद झाले आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने नदीला नदीचे रूप शिल्लक राहिलेले नाही. ही नदी गटारगंगा बनली आहे. या नदीपात्रात दोन्ही थडीला काँक्रीट रस्ता बनवून सुशोभीकरण करता येऊ शकते. मात्र, या विषयांची सत्ताधारी आणि विरोधकांना विसर पडला आहे. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार तरी खर्च होतो काय? याबाबत साशंकता आहे.

०५सीडीजे ६