शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

लासूरच्या डीएडधारक युवतीकडून शेतकरी जीवनसाथीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 18:33 IST

चोपडा तालुक्यातील लासूर येथील मयुरी माळी या डीएड झालेल्या युवतीने यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आणि शेतीकाम करणारा जीवनसाथी निवडून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. एवढेच नव्हे तर लग्नातील बडेजाव टाळून नोंदणी पद्धतीने विवाह केला.

ठळक मुद्देमुलीच्या इच्छेनुसार कोणताही बडेजाव न करता नोंदणी पध्दतीने विवाहआध्यात्माची आवड असलेल्या प्रकाशचे जीवन उजळले भक्कम साथीनेमान्यवरांकडून वधू- वरांचे तोंडभरून कौतुक

आॅनलाईन लोकमतयावल, दि.२८ : उत्तम शेती, मध्यम व्यापार, आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण सद्या सामाजिकदृष्ट्या मागे पडली असून बहुतेक सर्वच समाजातील विवाहेच्छुक युवतींची नोकरीवालाच वर मिळावा अशी अपेक्षा असते, ही बाब आता सर्वश्रृत आहे. मात्र चोपडा तालुक्यातील लासूर येथील मयुरी ज्ञानेश्वर माळी या डी.एड झालेल्या युवतीने यावल तालुक्यातील किनगाव येथील आध्यात्मिक क्षेत्रात वावर असलेल्या आणि शेती करणाऱ्या प्रकाश भिकन माळी या युवकाची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे मुलीच्या इच्छेनुसार लग्नात कोणताही बडेजाव न करता नोंदणी पध्दतीने विवाह पार पडला. नवविवाहीत जोडप्याने आपल्या आचरणातून दिलेल्या सामाजिक संदेशाचं सर्व स्तरात कौतुक होत आहे.किनगाव येथील भिकन माळी यांचा सुरवातीपासूनच आध्यात्मिक क्षेत्रात वावर असल्याने साहजिकच त्यांच्या मुलांमध्येही या विषयाची आवड निर्माण झाली. माळी अल्पभूधारक आहेत. त्यांचा मुलगा प्रकाश हा स्वत:च्या शेतीशिवाय दुस-याची शेती बटाईने करून आणि स्वत: शेतीत राबून कुटूंबाचा चरितार्थ चालवतों. त्याचबरोबर प्रकाश यास आध्यात्माची आवड असल्याने परिसरात कोठेही धार्मिक कार्यक्रम असला म्हणजे पखवाज वादक म्हणून प्रकाश आवर्जुन उपस्थित राहतो. कुटूंबियांचे संस्कार आणि आध्यात्माची ओढ यामुळे प्रकाश निर्व्यसनी आहे.दरम्यान, लासूर येथील मयुरी ज्ञानेश्वर माळी या डी. एड झालेल्या युवतीने नवरा शेतकरी असला तरी चालेल, पण तो निर्व्यसनी असावा अशी तिची अट होती. सुभाष भगवान महाजन, ह. भ. प. संदिप महाराज, योगेश महाराज पाडळसेकर, गजानन महाराज भोलाणेकर यांनी पुढाकर घेवून प्रकाश माळी याचे नाव सुचविले. वर-वधू पक्षाकडील सर्वांनी त्यास संमती दिली. एवढेच नव्हे तर मयुरी हिने लग्नात कोणताही बडेजाव न करता, तसेच सर्व सामाजिक रुढींना फाटा देऊन नोंदणी पध्दतीने लग्न करावे अशीही अट घातली. यालाही वधू-वर पक्षाकडून संमती मिळाल्यानंतर २१ जुलै रोजी नोंदणी पध्दतीेने हा विवाह पार पडला.या प्रसंगी वधू-वराकडील जवळच्या आप्तेष्टांसह अनेक जण उपस्थीत होते. शेतकरी संघटनेचे कडूआप्पा पाटील यांनी या विवाहाचे कौतुक करत इतर युवतीनींही मयुरीचा आदर्श घ्यावा असे सांगितले. सर्व समाजात असे आदर्श विवाह होणे गरजचे असल्याचेही त्यांनी पुढे नमुद केले. 

टॅग्स :marriageलग्न