शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिमणी दिन विशेष; सिलबंद खाद्यसंस्कृतीने हिरावला चिमण्यांचा घास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 16:53 IST

जागतिक चिमणी दिवस : संकटांच्या मालिकेतही चिवचिवाट कायम

कुंदन पाटील

जळगाव : ग्रामीण भागात अंगणात धान्य पाखडले जायचे. त्यातून चिमण्यापाखरांसह अनेक पक्षी खाद्य वेचायला दाराशी यायचे. मात्र आता सीलबंद खाद्यसंस्कृतीसह ‘मॉल’मधील धान्याने जणू चिमण्यांचा घासच हिरावला आहे, असेच चित्र सर्वदूर आहे.

चिमण्यांचा सात्विक चिवचिवाट जपण्यासाठी शासनासह अनेक पक्षीप्रेमी संघटनांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.  भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी म्हणून चिमण्यांची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जात आहे.

गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या प्रजाती :

१) पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर)२) रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट)३) भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर)४)सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर)५)  बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर)घट कशामुळे?१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण.२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, सिमेंटची घरांमुळे चिमण्यांचा रहिवास धोक्यात आला आहे. आधीच्या काळात कौलारू घरे व त्यासमोर असणाऱ्या विहिरींमुळे चिमण्यांचा मोठ्या प्रमाणावर रहिवास होता. ३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले.४.पिकांवर हानीकारक रासायनिक खतांची आणि किटकनाशकांची होणाऱ्या फवारणीतून विषबाधा झालेल्या चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास.संवर्धनाची गरजपाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.शेतीसाठी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.कोटचिमण्यांच्या आयुष्याचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. चिमण्यांचा दाराशी आणि अंगणात असणारा रहिवास आरोग्याच्यादृष्टीने नक्कीच ऊर्जादायी आहे. त्यामुळे प्रत्येकाने चिऊतांईसाठी पाणी, अन्न दाराशी उपलब्ध करावे आणि सात्विक चिवचिवाटाचे धनी व्हावे.-अश्विन लिलाचंद पाटील, संस्थापक अध्यक्ष, उडान पक्षीमित्र संस्था अमळनेर

टॅग्स :Jalgaonजळगाव