शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मिरची उद्योगाला ‘कोरोना’चा ठसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 00:14 IST

कोरोनामुळे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. परिणामी नंदुरबार येथील मिरची उद्योग थंडावला आहे. याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक रमाकांत पाटील...

महाराष्टÑात सर्वदूर परिचित असलेली नंदुरबारची मिरची आणि त्यावर सुरू असलेले येथील उद्योग सध्या ‘कोरोना’मुळे थंडावला आहे. परिणामी त्यावर आधारित सुमारे पाच हजार मजुरांचे हातही विसावले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होत आहे. गेल्या महिनाभरात हा उद्योग बंद असल्याने येथील कोट्यवधी रुपयांचे अर्थकारण ठप्प झाले आहे.नंदुरबार म्हटले म्हणजे त्यासोबत येथील मिरचीचे नाव जोडले गेले आहे. देशात तामिळनाडूतील गुंटूरनंतर महाराष्टÑातील नंदुरबार येथील मिरचीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. हंगामात रोज सुमारे एक लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक सुरू असते. ओली मिरची खरेदी करून व्यापारी ते जमिनीवर वाळवतात. त्यामुळे मिरची वाळवण्यासाठी लागणाऱ्या पथाºया म्हणजे लक्षवेधी. लांब लांब दृष्टी जाई तोपर्यंत लालच लाल मिरचीचा सडा नजरेस पडतो. जसे लाल गालिचे टाकले असल्याचा भास होतो. ही वाळवलेली मिरची नंतर मिरची उद्योगात त्याची पावडर केली जाते आणि देशातील विविध भागात ती विक्री होते. नंदुरबार शहरात मिरची पावडर तयार करणारे सुमारे चाळीसपेक्षा अधिक उद्योग असून येथील मिरचीला सर्वदूर मागणी आहे.सध्या मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने उद्योगच बंद पडले आहेत. अर्थात मिरची पावडर उद्योग हे कृषीवर आधारित असल्याने सरकारची त्याला परवानगी असली तरी कोरोनामुळे आलेली बंधने आणि नियम पाळताना अनेक अडचणींना उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा बंद असलेलेच बरे, अशी अवस्था उद्योजकांची झाली आहे. पण उद्योग बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेले जवळपास पाच हजार मजूर आज बेरोजगार झाले आहेत. उद्योगच बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे अर्थकारणही ठप्प झाले असून आता कधी एकदाचे कोरोनाचे संकट दूर होईल अन् उद्योग सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.-रमाकांत पाटील, नंदुरबार

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnandurbar-acनंदुरबार