शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2023 17:05 IST

अ.भा.हिंदू गोर बंजारा व लभाना नायकडा समाज कुंभमेळ्यातून दिला इशारा

कुंदन पाटील, जळगाव-सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरु होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करु नका, अशा शब्दात इशारा  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे इशारा दिला. सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंघ भारताला कुणीही रौखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोद्री ता.जामनेर येथे आयोजित अ.भा.हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेवबाबा,  द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा.स्व.संघाचे माजी , सहकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे शामचैतन्य महाराज, वृंदावनधामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज,बाबुसिंगजी महाराजांसह देशभरातील साधू-संत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

छेडछाड सहन करणार नाही

हा 'कुंभ आहे.कुंभाचा भाव म्हणजे सर्वसमावेशक कामनापूर्ती आणि सिद्धीपूर्ती.बंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्मघेतल्याचे सिद्ध केले आहे.सनातन हा मानवता धर्म आहे.सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे.त्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे, असेही योगी म्हणाले.देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित.म्हणूनच 'अतिथी देव भव' हा आमचा स्वभाव गुण आहे.त्यामुळे सनातन धर्माच्या मुल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे.मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला.

देशात दोन संविधान - रामदेवबाबा

देश चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे.मात्र धर्माला जगविण्यासाठी सनातन संविधान आवश्यक आहे.त्यामुळे देशात दोन संविधान असल्याचे धक्कादायक विधान योगगुरु रामदेवबाबा यांनी यावेळी केले.हिंदू धर्म विश्व धर्म आहे.सनातन धर्माची ताकद आणि मुल्यांना कुणीही हात लावू शकत नाही.धर्मांतराची भीक स्वीकारु नका.आपला 'डीएनए' सनातन धर्माचा आहे.त्यामुळे आपल्या दंडातल्या ताकदीतून कर्तृत्व दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिंदे-फडणवीस अचानक माघारी

दरम्यान या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने मेळाव्यासाठी मुंबईहून निघाले.मात्र दुपारी एक वाजता विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देत दोघे माघारी परतल्याचे आयोजकांनी यावेळी जाहीर केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jalgaonजळगावyogi adityanathयोगी आदित्यनाथ