शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2023 17:05 IST

अ.भा.हिंदू गोर बंजारा व लभाना नायकडा समाज कुंभमेळ्यातून दिला इशारा

कुंदन पाटील, जळगाव-सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरु होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करु नका, अशा शब्दात इशारा  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे इशारा दिला. सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंघ भारताला कुणीही रौखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोद्री ता.जामनेर येथे आयोजित अ.भा.हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरु रामदेवबाबा,  द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा.स्व.संघाचे माजी , सहकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे शामचैतन्य महाराज, वृंदावनधामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज,बाबुसिंगजी महाराजांसह देशभरातील साधू-संत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

छेडछाड सहन करणार नाही

हा 'कुंभ आहे.कुंभाचा भाव म्हणजे सर्वसमावेशक कामनापूर्ती आणि सिद्धीपूर्ती.बंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्मघेतल्याचे सिद्ध केले आहे.सनातन हा मानवता धर्म आहे.सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे.त्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे, असेही योगी म्हणाले.देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित.म्हणूनच 'अतिथी देव भव' हा आमचा स्वभाव गुण आहे.त्यामुळे सनातन धर्माच्या मुल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे.मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला.

देशात दोन संविधान - रामदेवबाबा

देश चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे.मात्र धर्माला जगविण्यासाठी सनातन संविधान आवश्यक आहे.त्यामुळे देशात दोन संविधान असल्याचे धक्कादायक विधान योगगुरु रामदेवबाबा यांनी यावेळी केले.हिंदू धर्म विश्व धर्म आहे.सनातन धर्माची ताकद आणि मुल्यांना कुणीही हात लावू शकत नाही.धर्मांतराची भीक स्वीकारु नका.आपला 'डीएनए' सनातन धर्माचा आहे.त्यामुळे आपल्या दंडातल्या ताकदीतून कर्तृत्व दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिंदे-फडणवीस अचानक माघारी

दरम्यान या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकाच विमानाने मेळाव्यासाठी मुंबईहून निघाले.मात्र दुपारी एक वाजता विमान तांत्रिक बिघाडाचे कारण देत दोघे माघारी परतल्याचे आयोजकांनी यावेळी जाहीर केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jalgaonजळगावyogi adityanathयोगी आदित्यनाथ