शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

मुख्यमंत्री आले अन् गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 19:10 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश विकास योजनांचा आढावा घेणे होता

चंद्रशेखर जोशीजळगावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा काय देऊन गेला, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणतीही मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर एक भावना नेहमी जनमानसात दिसून येते. ती म्हणजे ही व्यक्ती देणार काय? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश हा विकास योजनांचा आढावा घेणे हा होता. त्या अनुषंगाने समोर येणाºया विषयांचा त्यांनी उहापोह करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे या दौºयात केवळ अधिकारी वर्ग, पालकमंत्री किंवा तत्सम विभागांशी संबंधीत मंत्री त्या जिल्ह्यातील असेल तर तो अपेक्षित होता. या संदर्भात लोकप्रतिनिधींना निरोप दिले जाणे अपेक्षित होते. मात्र जळगावात तसे झाले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला मानापमानाचे ग्रहण लागले. बैठकीस आलेल्या काही लोकप्रतिनिधींना पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी अडविले. येथून ठिणगी पडली. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत जे येत असतील त्यांना येऊ द्या अशी सूचना दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षातील एकदोन वगळता सर्वच मंत्र्यांनी बैठकीत प्रवेश केला. मुख्यमंत्री येणार...समोर अधिकारी वर्ग व आपण व्यासपीठावर असणे ही फार मोठी बाब... (लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने) त्यानुसार त्यांची भूमिका या ठिकाणी दिसली. तब्बल चार ते साडेचार तास मॅरेथॉन बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाचे सावट आतापासून जाणवू लागले आहे. जिल्ह्यात जेमतेम ६५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्री मांडतात याबाबत लोकप्रतिनिधींना जास्त उत्सुकता होती. सिंचनाचा अनुशेष, निधीचा अनुशेष ही नित्त्याची बाब आहे. निधीच्या घोषणा या नेहमीच्याच. जलयुक्त शिवार अतिशय चांगली योजना पण पाऊसच पडला नसेल तर योजनेचा उपयोग तो काय? हीच स्थिती यंदा जिल्ह्यात आहे. गेल्या तब्बल चार वर्षांपासून दुष्काळामुळे जिल्ह्यातील बळीराजा होरपळत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती, बोंडअळीचे प्रताप सतावत असतात. यामुळे जे उत्पादन येणार तेदेखील अडचणीत येते. यंदा खरीप जेमतेम ५० टक्के येईल असा अंदाज आहे. रब्बीची आशा फारशी नाही. त्यामुळे काही दिलासादायक चित्र मुख्यमंत्र्यांनी उभे करणे अपेक्षित होते. नेमके ते झाले नाही. आता दिवाळी तोंडावर आहे. हा काळ उत्साहाचा त्यात काही दिले गेले असते तर फारचे चांगले झाले असते...अशाच प्रतिक्रीया उमटत आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव