शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आले अन् गेले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 19:10 IST

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश विकास योजनांचा आढावा घेणे होता

चंद्रशेखर जोशीजळगावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा काय देऊन गेला, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणतीही मोठी व्यक्ती येणार म्हटल्यावर एक भावना नेहमी जनमानसात दिसून येते. ती म्हणजे ही व्यक्ती देणार काय? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मूळ उद्देश हा विकास योजनांचा आढावा घेणे हा होता. त्या अनुषंगाने समोर येणाºया विषयांचा त्यांनी उहापोह करणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे या दौºयात केवळ अधिकारी वर्ग, पालकमंत्री किंवा तत्सम विभागांशी संबंधीत मंत्री त्या जिल्ह्यातील असेल तर तो अपेक्षित होता. या संदर्भात लोकप्रतिनिधींना निरोप दिले जाणे अपेक्षित होते. मात्र जळगावात तसे झाले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला मानापमानाचे ग्रहण लागले. बैठकीस आलेल्या काही लोकप्रतिनिधींना पोलीस प्रशासनातील अधिकाºयांनी अडविले. येथून ठिणगी पडली. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत जे येत असतील त्यांना येऊ द्या अशी सूचना दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षातील एकदोन वगळता सर्वच मंत्र्यांनी बैठकीत प्रवेश केला. मुख्यमंत्री येणार...समोर अधिकारी वर्ग व आपण व्यासपीठावर असणे ही फार मोठी बाब... (लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने) त्यानुसार त्यांची भूमिका या ठिकाणी दिसली. तब्बल चार ते साडेचार तास मॅरेथॉन बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाचे सावट आतापासून जाणवू लागले आहे. जिल्ह्यात जेमतेम ६५ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्री मांडतात याबाबत लोकप्रतिनिधींना जास्त उत्सुकता होती. सिंचनाचा अनुशेष, निधीचा अनुशेष ही नित्त्याची बाब आहे. निधीच्या घोषणा या नेहमीच्याच. जलयुक्त शिवार अतिशय चांगली योजना पण पाऊसच पडला नसेल तर योजनेचा उपयोग तो काय? हीच स्थिती यंदा जिल्ह्यात आहे. गेल्या तब्बल चार वर्षांपासून दुष्काळामुळे जिल्ह्यातील बळीराजा होरपळत आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती, बोंडअळीचे प्रताप सतावत असतात. यामुळे जे उत्पादन येणार तेदेखील अडचणीत येते. यंदा खरीप जेमतेम ५० टक्के येईल असा अंदाज आहे. रब्बीची आशा फारशी नाही. त्यामुळे काही दिलासादायक चित्र मुख्यमंत्र्यांनी उभे करणे अपेक्षित होते. नेमके ते झाले नाही. आता दिवाळी तोंडावर आहे. हा काळ उत्साहाचा त्यात काही दिले गेले असते तर फारचे चांगले झाले असते...अशाच प्रतिक्रीया उमटत आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीJalgaonजळगाव