शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

छत्रपती शिवरायांची लष्करी नीती, प्रशासकीय धोरणावर होणार मंथन...

By अमित महाबळ | Updated: December 24, 2023 20:03 IST

१६ फेब्रुवारी रोजी भारतीय सांस्कृतिक परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे बीजभाषण होणार आहे.

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कला व मानव्य प्रशाळा अंतर्गत संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.

चर्चासत्रात दि. १६ फेब्रुवारी रोजी भारतीय सांस्कृतिक परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे बीजभाषण होणार आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज : राष्ट्रबांधणी करणारे सर्वोत्कृष्ट नेतृत्व’ या विषयावर ते मांडणी करतील. निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी (छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय लष्करी शक्तीचे पुनरुज्जीवन आणि आधुनिक काळाशी त्यांची समयोचितता), डॉ. श्रीकांत परांजपे (छत्रपती शिवाजी महाराज : सर्वोत्कृष्ट सामरिक विचारवंत), माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर (छत्रपती शिवाजी महाराज : गुप्तहेर खाते आणि सध्याच्या हेर खात्यासाठी धडे), पुण्यातील ऐतिहासिक संशोधन मंडळाचे सदस्य विक्रमसिंग बाजी मोहिते (छत्रपती शिवाजी महाराज : दक्षिण दिग्विजय आणि त्यांचे सामरिक महत्त्व), नाशिकच्या हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रकाश पाठक (छत्रपती शिवाजी महाराज : गनिमी कावा युद्धपद्धती आणि आधुनिक युद्धपद्धतीत त्यांचे महत्त्व), छत्रपती शिवाजी महाराज रायगड मेमोरियल मंडळाचे संचालक रघुजी राजे आंग्रे (छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय नौदलाचे पितामह, शिवकाळातील नौदलाची नीती आणि त्यांचे शत्रूंवर झालेले परिणाम), महाराष्ट्र शासनाच्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार सुधीर थोरात (छत्रपती शिवाजी महाराज : स्वराज्यातील प्रशासन आणि सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठीचे धडे), डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाचे डॉ. सचिन जोशी (शिवकाळातील किल्ले : किल्ल्यांचे भूसामरिक महत्त्व), किल्ले रायगड संवर्धन आर्किटेक्ट रायगड प्राधिकरणाचे वरुण भामरे ( शिवकाळातील किल्ले : किल्ल्यांचे लष्करी स्थापत्यशास्त्र आणि त्यांचे जतन) हे मान्यवर सहभागी होणार आहेत. यशस्वीतेसाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे हे कार्याध्यक्ष, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. रामचंद्र भावसार हे समन्वयक आणि संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग हे सचिव म्हणून काम पाहत आहेत. 

टॅग्स :Jalgaonजळगाव