शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या फुकटेपणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:27 IST

वार्तापत्र- महसूल : सुशील देवकर

मोठा गाजावाजा करीत शासनाने महसूल विभागाचे सातबारा व इतर दाखले आॅनलाईन उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी योजना आखली. त्यात तलाठी कार्यालयात नागरिकांना रांगा लावाव्या लागून होणारा मनस्ताप टळावा, तलाठी कार्यालयात या निमित्ताने होणारी अडवणूक व नागरिकांची होणारी पिळवणूक थांबावी या उद्देशाने नागरिकांना आॅनलाईनच जर हे दाखले मिळाले तर सर्वच प्रश्न मिटतील, या उद्देशाने शासनाने सातबारा व इतर दाखले आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार महसूल विभागाने प्रथम सातबारा आॅनलाईन करण्याचे वेळखाऊ काम हाती घेतले. यंत्रणा कामाला लागली. मात्र जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये सातबारा रि-एडिट व त्यानंतर डीएसपी (डीजीटल सिग्नेचर प्रिंट) करण्याचे काम बाकी असतानाच शासनाने घाईगर्दीत या योजनेचे १ मे रोजी लोकार्पणही उरकून टाकले. त्यामुळे आता हाताने लिहिलेला सातबारा तलाठी देऊ शकत नाही. मात्र डिजीटल सिग्नेचरचे काम बाकी असल्याने तो सातबाराही मिळू शकत नाही. मग काय? तर वेबसाईटवर लोड केलेल्या सातबाराची प्रिंट काढायची व त्यावर तलाठ्याची सही घ्यायची, असा मार्ग निघाला. मात्र डाटा सेंटरच्या सर्व्हरला सातत्याने येत असलेला प्रॉब्लेम व त्यामुळे अनेकदा तर वेबसाईटही ओपन होण्यास येणारे अडथळे यामुळे नागरिक, शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत माहिती घेतली असता समजले की शासनाच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लढवून या योजनेसाठी स्वतंत्र डाटासेंटरच सुरू केले आहे. त्या डाटासेंटरमध्ये मात्र वापरली जात असलेली आॅपरेटिंग सिस्टीम व सॉफ्टवेअर हे वेबसाईटवर मोफतमध्ये उपलब्ध होणारे सॉफ्टवेअर वापरले असल्याचे समजते. त्यातच डाटासेंटरची क्षमताही कमी पडत असावी. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांना त्यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे. अखेर हा डाटा ‘क्लाऊड’वर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यातही वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची, शेतकºयांची गैरसोय कायम आहे. एक दिवस वेबसाईट सुरू होते तर चार दिवस बंद राहते, अशी परिस्थिती आहे. जर शासनाने एवढी महत्वाकांक्षी योजना सुरू केली तर त्याचे काम एनआयसीकडे का देण्यात आले नाही? असा सवालही उपस्थित होत आहे. एनआयसी हा शासनाचाच भाग आहे. शासनाचेच विविध प्रकल्प एनआयसी व्यवस्थितपणे हाताळत असताना स्वतंत्र डाटासेंटर निर्माण करण्याचा घाट घातला गेला. त्यातही फुकटचे सॉफ्टवेअर वापरल्याने अनेक अडथळे येत असल्याने हा विषय टीकेचा बनला आहे.