शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भागपूर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणारा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:25 IST

भागपूर उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन

पहूर, ता. जामनेर - भागपूर उपसा सिंचन प्रकल्प हा शेतकऱ्यांचे भाग्य बदलवणारा प्रकल्प असून यामुळे शेतीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व श्रीमंत होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी पहूर येथे शुक्रवारी केले.भागपूर उपसा सिंचन योजना टप्पा २ या योजनेचे ई भूमीपूजन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत विकास महामंडळ जळगाव, उपसा सिंचन बांधकाम विभाग जळगाव यांच्यावतीने जामनेर रोडलगत पहूर येथे आयोजित या कार्यक्रमप्रसंगी या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, माजी मंत्री एम.के.पाटील, जि.प.उपध्याक्ष नंदकिशोर महाजन, राज्याचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पेठ सरंपच नीता पाटील, कसबे सरंपच ज्योती घोंगडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जि.प.महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, सभापती रूपाली पाटील, नगरध्याक्षा विजया खलसे, कृउबा समिती सभापती संजय देशमुख, तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस.मोरे, कार्यकारी संचालक एस.डी. कुलकर्णी, जि.प.सदस्य अमित देशमुख, पं.स. सदस्य नीता पाटील, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, प्रांतधिकारी चवरे उपस्थित होते.दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणारपुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन हजार तीनशे कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे दरवर्षी जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील शेतकºयांचे उत्पन्न चाळीस हजार कोटी ने वाढले आहे. शेतीचा विकासक २३ टक्केच्या पुढे गेला आहे.कॉंग्रेसच्या काळात शेती विकास दर ठप्पआम्ही शेतकºयांना आनंदी व श्रीमंत करणारे असून काँग्रेसच्या सरकारने फक्त शेतकºयांना अशिक्षित ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या कार्यकाळात शेतीविकास दर वाढला नाही, तो आमच्या सरकारने करून दाखविले आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे ही गिरीश महाजन यांची जबाबदारी आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी अवघ्या पाच मिनिटात अध्यक्षीय भाषण उरकले.मी खाली तिजोरीचा मंत्री - गुलाबराव पाटीलआमची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुमच्याकडे बजेट आहे. मी खाली तिजोरीचा मंत्री आहे. शेवटी शेजारच्या महाजनांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटवून भले केले आहे, असे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला. शेतकºयांना पाणी, रस्ते, वीज हे मिळाल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे, यात शंका नाही. पण पाच तालुक्यांचा तापी प्रकल्प असलेल्या निम्न तापी प्रकल्पाला निधीची तरतूद करून प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा ही महाजनांकडून आहे असे ना गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव