शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

भागपूर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे भाग्य बदलणारा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:25 IST

भागपूर उपसा सिंचन योजनेचे भूमीपूजन

पहूर, ता. जामनेर - भागपूर उपसा सिंचन प्रकल्प हा शेतकऱ्यांचे भाग्य बदलवणारा प्रकल्प असून यामुळे शेतीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व श्रीमंत होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी पहूर येथे शुक्रवारी केले.भागपूर उपसा सिंचन योजना टप्पा २ या योजनेचे ई भूमीपूजन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत विकास महामंडळ जळगाव, उपसा सिंचन बांधकाम विभाग जळगाव यांच्यावतीने जामनेर रोडलगत पहूर येथे आयोजित या कार्यक्रमप्रसंगी या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, हरीभाऊ जावळे, संजय सावकारे, उन्मेष पाटील, सुरेश भोळे, माजी मंत्री एम.के.पाटील, जि.प.उपध्याक्ष नंदकिशोर महाजन, राज्याचे माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पेठ सरंपच नीता पाटील, कसबे सरंपच ज्योती घोंगडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जि.प.महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, सभापती रूपाली पाटील, नगरध्याक्षा विजया खलसे, कृउबा समिती सभापती संजय देशमुख, तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस.मोरे, कार्यकारी संचालक एस.डी. कुलकर्णी, जि.प.सदस्य अमित देशमुख, पं.स. सदस्य नीता पाटील, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, प्रांतधिकारी चवरे उपस्थित होते.दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणारपुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, दोन हजार तीनशे कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे दरवर्षी जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सहाशे साठ कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील शेतकºयांचे उत्पन्न चाळीस हजार कोटी ने वाढले आहे. शेतीचा विकासक २३ टक्केच्या पुढे गेला आहे.कॉंग्रेसच्या काळात शेती विकास दर ठप्पआम्ही शेतकºयांना आनंदी व श्रीमंत करणारे असून काँग्रेसच्या सरकारने फक्त शेतकºयांना अशिक्षित ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या कार्यकाळात शेतीविकास दर वाढला नाही, तो आमच्या सरकारने करून दाखविले आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे ही गिरीश महाजन यांची जबाबदारी आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी अवघ्या पाच मिनिटात अध्यक्षीय भाषण उरकले.मी खाली तिजोरीचा मंत्री - गुलाबराव पाटीलआमची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुमच्याकडे बजेट आहे. मी खाली तिजोरीचा मंत्री आहे. शेवटी शेजारच्या महाजनांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न मिटवून भले केले आहे, असे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला. शेतकºयांना पाणी, रस्ते, वीज हे मिळाल्यास शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे, यात शंका नाही. पण पाच तालुक्यांचा तापी प्रकल्प असलेल्या निम्न तापी प्रकल्पाला निधीची तरतूद करून प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा ही महाजनांकडून आहे असे ना गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव