शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या आराखड्यात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 23:50 IST

बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केवळ साडेनऊ ते दहा कोटींच्या निधीसाठी हे काम रखडले होते.

जळगाव : असोदा येथे उभारण्यात येत असलेल्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम कमी निधीत व्हावे या हेतूने स्मारकाच्या मूळ आराखड्यात प्रशासनाने परस्पर बदल केला. त्यामुळे शासन व प्रशासनाची या स्मारकाप्रती असलेली अनास्था उघड झाली आहे. याबाबत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर आता निधीसाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार आहे.३ डिसेंबरला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासंदर्भात स्मारक समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली. त्यावर निधीसाठी सुमारे २३ कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम केवळ साडेनऊ ते दहा कोटींच्या निधीसाठी हे काम रखडले होते. आता या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बजेट २३ कोटींवर गेले आहे.- खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ३ डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मारक जळगावनजीक असोदा येथे होत आहे. त्यासाठी शासनाने निधीसाठी हात आखडता घेतला आहे.- स्मारकाचे काम मूळ आराखड्यानुसारच होईल, अशी मागणी समितीने व नागरिकांनी केल्यावर प्रशासनाने तसे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात अ‍ॅम्पीथिएटरवर पत्रे टाकण्यात आले. तर पुढील बाजूने केवळ स्लॅब टाकण्यात आला. उपलब्ध निधीतून केवळ उंची १० मीटरने कमी केलेल्या इमारतीचेच काम झाले आहे. तर सुशोभिकरणाचे काम करण्यासाठी निधीच शिल्लक नाही. त्यामुळे याबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे स्मारक समितीचे किशोर चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव