शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या वाचन पद्धतीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:11 IST

तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देजोडाक्षरे वाचण्यातून सुटका२१ ते ९९ या संख्यांमध्ये बदलशिक्षकांनी शिकविताना जोडाक्षरे न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.संख्यावाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, सदुसष्ट ऐवजी साठ सात, त्रेपन्न ऐवजी पन्नास तीन असे वाचन असणार आहेबदल का करण्यात आला - कारण इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलगू, तामिळ, मल्याळी या भाषेतसुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते, त्यामुळे याचा अवलंब करण्यात आला आहे.

अजय कोतकरगोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत.मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचे सांगत बालभारतीने नवीन पद्धती अवलंबली आहे. यावर्षी दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. अकरावी अभ्यासक्रम सुरू होण्यास अद्याप एक-दीड महिना बाकी आहे; पण दुसरीच्या बदलाने मात्र शिक्षक वर्ग अचंबित झाला आहे. जोडाक्षरे नको म्हणून पाढे पठणाची व लिहिण्याची पद्धतच बदलली आहे. या शैक्षणिक वर्षापासून दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. या पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरुपात मांडणी देण्यात आली आहे. मात्र ही देत असताना शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार आहेच. तसेच ही भाषेची गळचेपी असल्याची भावानाही शिक्षक वर्ग व्यक्त करत आहे.संख्या वाचनासाठी तीन पद्धती देण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत वापरता येऊ शकते. इंग्रजीतील संख्या वाचन पद्धतीनुसार ही पद्धत करण्यात आली आहे. इतर सर्व प्रादेशिक भाषांमध्येही संख्या वाचन हे इंग्रजीप्रमाणेच असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. हा बदल सर्व स्तरावर स्वीकारला गेल्यास यात विद्यार्थ्यांचा फायदा आहे.बºयाच विद्यार्थ्यांना जोडाक्षरे वाचताना व लिहताना त्रास होत होता, परंतु आताच्या बदललेल्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमात वाचन सोपे झाले आहे 

टॅग्स :Educationशिक्षणBhadgaon भडगाव