शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जळगाव जिल्हा पोलीस दलात बदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:50 IST

: जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस वार्तापत्रकर्मचा-यांचे गॅझेट बनविण्याचे काम सुरुएस.पी,ए.एसपींची पदोन्नतीने बदली होणार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि,१८ : जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचा-यांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचा-यांनी पसंतीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आपआपल्या पध्दतीने फिल्डींग लावली आहे. पोलीस दलात अधिका-यांच्या बदलीचा इतका त्रास होत नाही, त्याहीपेक्षा कर्मचारी बदलीत पोलीस अधीक्षकांना होतो. आमदारापासून तर मंत्र्यांपर्यंतच्या शिफारशी या बदल्यात होतात. शिफारशीनेही काम झाले नाही तर थेट मंत्र्यांनाच फोन करायला भाग पाडले जाते. प्रत्येक बदलीत कोणाचा अन् कोणाचा तरी कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला असतो. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत राजकीय दबाव झुगारुन लावला होता. राजकीय दबाव आणणाºया कर्मचाºयाची इच्छीतस्थळी बदली न करता दुस-याच ठिकाणी बदली केल्याचे काही किस्से घडले होते. यातून कराळे यांनी शिस्तीची जाणीव करुन दिली होती. कराळे यांची पदोन्नती झालेली आहे, त्यामुळे केव्हाही त्यांच्या बदलीचे आदेश येऊ शकतात. नवीन अधीक्षक कोण व कसा असणार याची चिंता बदलीपात्र कर्मचाºयांना लागली आहे. त्यामुळे कराळे यांच्या काळात बदलीचे गॅझेट निघाले तर काही अंशी मनासारखी बदली मिळेल अशी अपेक्षा काही कर्मचाºयांना आहे. कर्मचाºयांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व सहा पोलीस निरीक्षक बदलीस पात्र आहेत. या सर्वांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. पोलीस अधीक्षक कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व निलोत्पल हे पदोन्नतीने बदलून जाणार आहेत. पोलीस स्टेशनचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या प्रभारी अधिका-यांच्याही महिनाभरात बदल्या होणार आहेत. सहायक निरीक्षक प्रभारी असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय जळगाव उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांचाही काही महिन्यात कार्यकाळ पूर्ण होणार आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता त्यांच्या काळात ही निवडणूक होती की त्यापूर्वीच त्यांची बदली होते याकडेही शहरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. एप्रिल ते जून असे तीन महिने कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीचा काळ असतो. पोलीस अधीक्षक, विशेष  पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालक अशा तीन टप्प्यात बदल्या होतात.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा