शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

७२७ वर्षांची परंपरा असणारा चाळीसगावचा बामोशी बाबा उरुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:06 IST

तीन दिवसांच्या मुख्य उरुस दरम्यान तलवार मिरवणुकीस लोटतो भाविकांचा जनसागर

ठळक मुद्देतलवार मिरवणुक आणि भक्तिभावचादर, शिरणी आणि न्याजसमाधीचे दुधाने स्नान

जिजाबराव वाघ/आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि : २८ : हजरत पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या सर्वधर्मीय उरुसाचे यंदाचे हे ७२८ वे वर्ष आहे. तीन दिवसीय मुख्य उत्सवाला शनिवार ३१ पासून सुरुवात होत आहे. पोलीस प्रशासनाने नुकताच परिसराचा आढावा घेऊन सुरक्षेसाठी तयारी पूर्ण केली आहे.समाधीचे दुधाने स्नानतीन दिवस चालणाऱ्या उरुस यात्रोत्सवाची सुरुवात बामोशी बाबांच्या समाधीच्या स्नानाने होते. ३१ रोजी रात्री बारानंतर पहाटे चार पर्यंत दुध, गुलाबपाणी, सुगंधी अत्तराने कबरीचे शाही स्नान केले जाते.चला चला 'कादरी' का संदलउत्सवाच्या दुस-या दिवशी संदल मिरवणुक निघते. यावर्षी १ एप्रिल रोजी रथगल्लीतील तमीजोद्दीन शेख यांच्या घरुन परंपरेप्रमाणे सायंकाळी पाच वाजता संदल मिरवणुक निघेल. ही मिरवणुक वाजत - गाजत रात्री साडे नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी पोहचते. यावेळी मिरवणुक वाजत - गाजत आणलेले संदल (चंदन) अर्पण केले जाते. मानाची चादर कबरीवर टाकण्यात येते.तलवार मिरवणुक आणि भक्तिभावभालचंद्र भास्करराव देशमुख हे तलवार भुवनचे संस्थापक व प्रमुख आहेत. गेल्या ७२७ वर्षांपासून याठिकाणावरून तलवारीची भव्य मिरवणुक निघते. यंदा ही मिरवणुक २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. हिरव्या चुडीचादरीत गुंडाळलेली तलवार, भगवा फेटा आणि टिळा लावलेला देशमुख कुमार धरतो. मिरवणुकीत सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात. राष्ट्रीय एकात्मतेचे हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. बँण्डची सुरावट, ढोल पथकाचे गगनभेदी ताल, हजारो मुखातून बाबांचा होणार गजर, वाटेत ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी...अशा वातावरणात ही मिरवणुक पुढे सरकते. रात्री नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी तलवारीचा मुक्काम असतो.काय आहे अख्यायिकापीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या चाळीसगाव शहरातील वास्तव्याबाबत वेगवेगळ्या अख्यायिका असल्या तरी ते आठव्या शतकातील सुफी संत म्हणून परिचित आहेत. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी वेगवेगळे चत्मकारही करुन दाखविले. अवलिया संतांसारखी त्यांची दिनचर्या होती. रंजल्या - गांजल्या लोकांची दु:खे दूर करण्यात त्यांना आत्मानंद वाटत असे. शहराच्या नैऋत्य दिशेला डोंगरी नदीच्या किनारी त्यांची समाधी असून येथेच दर्गाह उभारण्यात आला आहे. बाबांनीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ असणारी तलवार भालचंद्र देशमुख यांना सुपूर्द केली. तलवार मिरवणुकीत धुनी धरण्याचा मान चाळीसगावचे पोलीस पाटील स्व. वसंतराव भास्करराव देशमुख यांच्या कुटूंबियांकडे आहे.चादर, शिरणी आणि न्याजचाळीसगाव पंचक्रोशीतून अनेक भाविक बाबांच्या समाधीवर 'चादर' चढवतात. चादरीसोबत गोड शिरणी, न्याज (गोड भात) अशी सवाद्य मिरवणुक काढली जाते. बाबांच्या समाधीवर टाकण्यात येणारी चादर मुंबई, पुणे, बुलढाणा येथून येते. चादरीवर कुराण मधील 'आयते सुरह' लिहिले असतात. उरुस पर्वणीत चादर सेवा विशेष मानली जाते. सर्वधर्मीय लोक चादर चढवितात.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव