शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

७२७ वर्षांची परंपरा असणारा चाळीसगावचा बामोशी बाबा उरुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:06 IST

तीन दिवसांच्या मुख्य उरुस दरम्यान तलवार मिरवणुकीस लोटतो भाविकांचा जनसागर

ठळक मुद्देतलवार मिरवणुक आणि भक्तिभावचादर, शिरणी आणि न्याजसमाधीचे दुधाने स्नान

जिजाबराव वाघ/आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि : २८ : हजरत पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या सर्वधर्मीय उरुसाचे यंदाचे हे ७२८ वे वर्ष आहे. तीन दिवसीय मुख्य उत्सवाला शनिवार ३१ पासून सुरुवात होत आहे. पोलीस प्रशासनाने नुकताच परिसराचा आढावा घेऊन सुरक्षेसाठी तयारी पूर्ण केली आहे.समाधीचे दुधाने स्नानतीन दिवस चालणाऱ्या उरुस यात्रोत्सवाची सुरुवात बामोशी बाबांच्या समाधीच्या स्नानाने होते. ३१ रोजी रात्री बारानंतर पहाटे चार पर्यंत दुध, गुलाबपाणी, सुगंधी अत्तराने कबरीचे शाही स्नान केले जाते.चला चला 'कादरी' का संदलउत्सवाच्या दुस-या दिवशी संदल मिरवणुक निघते. यावर्षी १ एप्रिल रोजी रथगल्लीतील तमीजोद्दीन शेख यांच्या घरुन परंपरेप्रमाणे सायंकाळी पाच वाजता संदल मिरवणुक निघेल. ही मिरवणुक वाजत - गाजत रात्री साडे नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी पोहचते. यावेळी मिरवणुक वाजत - गाजत आणलेले संदल (चंदन) अर्पण केले जाते. मानाची चादर कबरीवर टाकण्यात येते.तलवार मिरवणुक आणि भक्तिभावभालचंद्र भास्करराव देशमुख हे तलवार भुवनचे संस्थापक व प्रमुख आहेत. गेल्या ७२७ वर्षांपासून याठिकाणावरून तलवारीची भव्य मिरवणुक निघते. यंदा ही मिरवणुक २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. हिरव्या चुडीचादरीत गुंडाळलेली तलवार, भगवा फेटा आणि टिळा लावलेला देशमुख कुमार धरतो. मिरवणुकीत सर्वधर्मीय भाविक सहभागी होतात. राष्ट्रीय एकात्मतेचे हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. बँण्डची सुरावट, ढोल पथकाचे गगनभेदी ताल, हजारो मुखातून बाबांचा होणार गजर, वाटेत ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी...अशा वातावरणात ही मिरवणुक पुढे सरकते. रात्री नऊ वाजता बाबांच्या समाधीस्थळी तलवारीचा मुक्काम असतो.काय आहे अख्यायिकापीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांच्या चाळीसगाव शहरातील वास्तव्याबाबत वेगवेगळ्या अख्यायिका असल्या तरी ते आठव्या शतकातील सुफी संत म्हणून परिचित आहेत. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी वेगवेगळे चत्मकारही करुन दाखविले. अवलिया संतांसारखी त्यांची दिनचर्या होती. रंजल्या - गांजल्या लोकांची दु:खे दूर करण्यात त्यांना आत्मानंद वाटत असे. शहराच्या नैऋत्य दिशेला डोंगरी नदीच्या किनारी त्यांची समाधी असून येथेच दर्गाह उभारण्यात आला आहे. बाबांनीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ असणारी तलवार भालचंद्र देशमुख यांना सुपूर्द केली. तलवार मिरवणुकीत धुनी धरण्याचा मान चाळीसगावचे पोलीस पाटील स्व. वसंतराव भास्करराव देशमुख यांच्या कुटूंबियांकडे आहे.चादर, शिरणी आणि न्याजचाळीसगाव पंचक्रोशीतून अनेक भाविक बाबांच्या समाधीवर 'चादर' चढवतात. चादरीसोबत गोड शिरणी, न्याज (गोड भात) अशी सवाद्य मिरवणुक काढली जाते. बाबांच्या समाधीवर टाकण्यात येणारी चादर मुंबई, पुणे, बुलढाणा येथून येते. चादरीवर कुराण मधील 'आयते सुरह' लिहिले असतात. उरुस पर्वणीत चादर सेवा विशेष मानली जाते. सर्वधर्मीय लोक चादर चढवितात.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव