शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 15:55 IST

गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा६० टक्के उत्पन्नाला फटकाबाजार समितीतही ५० लाखांचे नुकसानबाजार समितीत 'मक्याला' फुटले 'कोंब'पंचनामे तातडीने करा

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात असल्याने अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. बाजार समितीतही मका व अन्य शेतमालाचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गेली तीन वर्ष चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ मुक्कामी असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आहे. यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला अभूतपूर्व पाणीटंचाई उदभवल्याने जनावरांच्या चारा-पाण्याचे प्रचंड हाल झाले. पाणीटंचाईमुळे नागरिकदेखील हतबल झाले होते. सुरुवातीला पावसाने ओढ घेतली. मात्र उत्तरार्धात त्याची हजेरी नियमित झाल्याने यंदा चांगले उत्पन्न येण्याच्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाचा अवकाळी मारा सुरू असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घासच हिरावल्यासारखी स्थिती असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे.धान्य पिकांचे नुकसानचाळीसगाव तालुक्यात कपाशी पेºया खालोखाल धान्य पिकांची लागवड होते. यामुळे बाजरी, ज्वारी व कडधान्ये पिकांची कापणी करण्यात आली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली पूर्णपणे भिजून वाया गेली आहे. ज्वारीच्या कणसांना पुन्हा कोंब फुटले आहेत. ज्वारी काळपट होईल, असे शेतकºयांनी सांगितले.काही ठिकाणी कांदा पिकाचीही लागवड करण्यात आली. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे. चढ्या दराने खरेदी केलेली रोपे कुजू लागली आहे. यात शेतकºयांना फटका बसला आहे.मे व जूनमध्ये लागवड केलेले कपाशी पीक वेचणीला आले असताना ते पावसाच्या खिंडीत सापडले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.बाजार समितीत 'मक्याला' फुटले 'कोंब'बाजार समितीत गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर मक्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाºयांनी खरेदी केलेला मका बाजार समितीतच पडून आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचे धूमशान सुरू असल्याने तीन हजार क्विंटल मका पूर्णपणे भिजला आहे. मंगळवारी मका सुकवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सायंकाळी आलेल्या पावसाने तो पुन्हा भिजला. भिजल्याने मक्याला कोंब फुटले आहेत. व्यापाºयांचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.पंचनामे तातडीने कराअवकाळी पावसाने यावर्षी शेतकºयांचे कंबरडे मोडले असून तो कोलमडून पडला आहे. धान्य, कडधान्य, कापूस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतमाल भिजल्याने कुजू लागला आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहोत.- दिनेश पाटीलतालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, चाळीसगाव

टॅग्स :RainपाऊसChalisgaonचाळीसगाव