- जिजाबराव वाघ
जळगाव : गत आठ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यात पाऊस मुक्कामी असून अतिवृष्टी होत आहे. गेल्या मंगळवारी म्हणजेच ३१ आॕगस्ट रोजी डोंगरी व तितूर नदीला महापूर अला होता. आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता डोंगरी व तितूर नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
पुरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बामोशी बाबा दर्गाह परिसरात दर्गाहाच्या पाय-या पाण्यात बुडाल्या आहेत. महसूल प्रशासनाने अर्लट जारी केला आहे. नदी काठावरील नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.