शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

चाळीसगाव, नांदगाव रस्ता झाला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

चाळीसगाव : चाळीसगाव-नांदगाव रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्यावर वेगाला नियंत्रण आणण्यासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता ...

चाळीसगाव : चाळीसगाव-नांदगाव रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्यावर वेगाला नियंत्रण आणण्यासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे.त्याचाच एक भाग म्हणून या सुसाट रस्त्यावरून भरघाव वेगाने चालणाऱ्या कारने दुचाकी वाहनाला जोरदारपणे धडक दिल्याने दोन दिवसांपूर्वी चार जणांचा बळी गेला होता. या घटनेत घटनास्थळी रोहिणी,लक्ष्मीवाडी व तळेगाव येथील ग्रामस्थांनी जखमींना उचलण्यापासून ते थेट दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापर्यंत मदतकार्य करून माणुसकीचे दर्शन घडविले.

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भगवान नगराज पाटील यांच्या शेतात तांदुळवाडी ता.कन्नड येथील विलास वसंत ठाकरे हे कुटुंबासह राहत होते. ते या परिसरात शेतमजुरी करीत असत. ठाकरे यांच्या गर्भवती पत्नीला बाळंतपणासाठी आपल्या गावी सोडवण्यासाठी भगवान पाटील यांच्या मोटारसायकलने तांदुळवाडीकडे जात असताना भरधाव कारने धडक दिल्याने चार जणांचा बळी गेला होता.

चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील रोहिणी गावाजवळ सकाळपासून या रस्त्यावर छोटा हत्ती या वाहनाचे टायर फुटल्यामुळे रस्त्यात उभा होता. या वाहनांच्या काही अंतरावर कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदारपणे धडक झाली.

वाहनांचा अमर्याद वेग

या अपघाताची माहिती देताना येथील काही जण सांगतात, अतिशय भयंकर असे अपघाताचे दृश्य होते. कारच्या अमर्याद वेगामुळे मोटारसायकलवरील चार जण दूरवर फेकले गेले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी या घटनेच्या काही अंतरावर सायंकाळी पाच वाजता समोरासमोर मोटारसायकलची धडक झाली. त्यात दोघेजण जखमी झाले आहेत.

नेहमीच मदतीसाठी धावाधाव

या भागात नेहमी अपघात होत असतात. अपघाताची ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी हॉटेलचे मालक भिका दराडे व त्यांचा मुलगा,संजय घुगे, संजय सानप,संजय गिरे, लक्ष्मीवाडीतील आबा पाटील,नितीन दराडे तसेच तळेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. या गावकऱ्यांनी सर्वप्रथम जवळच असलेल्या तळेगाव येथील आरोग्य केंद्राचे वाहन बोलविले नंतर चाळीसगावशी संपर्क साधून वाहनाची मागणी केली. तळेगावच्या वाहनातून गर्भवती महिला व एक जणांना तर चाळीसगावच्या वाहनातून अन्य जणांना उपचारासाठी पाठविले. तांदुळवाडी येथे या घटनेने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला धुळे येथे घेऊन जाण्यास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी वेळ न दवडता लगेच खासगी रुग्णवाहिका स्व खर्चाने करून जखमी मुलाला धुळे येथे हलविले.

----

नियोजन गरजेचे

या भागातील रस्ता अतिशय चांगला झाला आहे, त्यामुळे नेहमी वाहने बेफान वेगाने येत-जात असतात. एखादे वाहन किंवा व्यक्ती आल्यास ती मेलीच म्हणून समजा. अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण गरजेचे आहे.