शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला गेल्यावर्षीच्या तुलनेत खरिपाची पेरणी पिछाडीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिल्याने दि. ३० अखेर खरिपाची पेरणी पिछाडीवर आहे. गतवर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिल्याने दि. ३० अखेर खरिपाची पेरणी पिछाडीवर आहे. गतवर्षी ३० जूनअखेर ९० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले होते. यंदा मात्र ‘लेट लतिफ’ ठरलेल्या पावसामुळे हे वेळापत्रक कोलमडले आहे. बुधवारअखेर एकूण उद्दिष्टापैकी ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या असून गतवर्षीच्या ताळेबंदानुसार यंदाचे हे क्षेत्र २५ ते ३० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे शेतकरी अजूनही चिंताक्रांत असून, पाऊस सर्वदूर सक्रिय होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.

मृग नक्षत्र सुरू होऊनही दडी मारून बसलेल्या पावसाने समाधानकारक कमबॅक करीत सोमवारी तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. यामुळे खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याने शेती - शिवार चांगलेच गजबजून गेले आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला या पावसाने दिलासा दिला असला तरी, त्याचे आता सातत्य असणे गरजेचे आहे. बागायती पिके तरारली असून धूळपेरणीवरील दुबारचे सावटही टळले आहे. मान्सूनपूर्व पावसाने परिसरात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. तथापि, आठपासून मृग नक्षत्रावरच पाऊस गायब झाल्याने खरिपाच्या पेरणीला ब्रेक लागला होता. अधुनमधून तुरळक पाऊस होत असला तरी, शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची आवश्यकता होती. सोमवारी बहुतांशी भागात त्याने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला असून बुधवारअखेर ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला असला तरी, विखुरलेल्या पावसाने शेतकरी अजूनही हवालदिल आहे. पाऊस सर्वच भागात सारख्या प्रमाणात सक्रिय नाही. तो विखुरलेला असल्याने काही भागातील पेरण्या अजूनही होऊ शकलेल्या नाहीत. यापुढील नक्षत्रांवर पावसाने छत्री धरावी, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

गेल्यावर्षाच्या तुलनेत खरिपाचे रिपोर्टकार्ड समाधानकारक नाही. गतवर्षी ३० जूनअखेर पावसाच्या सक्रियतेमुळे ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी पावसाने उसंत घेतल्याने बुधवारअखेर ५६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.

चाळीसगाव तालुक्याचे भौगिलिक क्षेत्र एक लाख २१ हजार ९०४ हेक्टर असून ९० हजार ३१८ वहिवाटीखालील आहे. ८१ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट यावर्षी कृषी विभागाने निश्चित केले आहे.

१... एकूण लागवड क्षेत्रापैकी सर्वाधिक पेरा कपाशीचा होतो.

२..कोरडवाहू व बागायती असे एकूण ६१ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणे अपेक्षित आहे.

३...सोमवारी झालेल्या पावसामुळे ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

४ कपाशीनंतर मका लागवडीच्या एकूण ११ हजार ३८४ हेक्टर उद्दिष्टापैकी बुधवारअखेर नऊ ते दहा हजार हेक्टरवर मका लागवड झाली आहे. उर्वरित लागवडीत तृणधान्ये व कडधान्यांचा समावेश आहे.

बागायती कपाशी तरारली

तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने यावर्षी बागायती कपाशीचा पेरा चांगला झाला. मेच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या पेरणीस सोमवारी झालेल्या पावसाने बुस्टर डोसच दिला आहे. ही कपाशी तरारली आहे. या क्षेत्रावरील पेरणीनंतरच्या मशागतीलाही वेग आला आहे.

धूळपेरणीला ‘जीवदान’

आभाळभरोसे होणाऱ्या धूळपेरणीवर पावसाने दडी मारल्याने ‘दुबार’चे सावट गडद झाले होते. मात्र २० व २१ सह सोमवारी झालेल्या पावसाने या पेरणीलाही जीवदान मिळाले असून दुबारचे मळभ हटले आहे. पाच ते सहा हजार हेक्टरवर हा पेरा झाला आहे. धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

मृग नक्षत्र कोरडेच

आठपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राचे जवळपास १३ दिवस कोरडेठाकच गेले आहेत. १९ व २० रोजी काही भागात पाऊस पडला. मात्र तो दमदार नव्हता. दि. २१ पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या नक्षत्रावरही पावसाची उसंत कायम होती. तब्बल सात दिवसांनंतर २८ रोजी आर्द्रा नक्षत्रातील दमदार आभाळधारा कोसळल्या. या पावसानेच खऱ्याअर्थाने खरिपाच्या हंगामाला चालना दिली आहे.

बुधवारअखेर तालुक्यात १६६.५५ पावसाची नोंद महसूल विभागाने केली आहे.

७२९ मि.मी. पाऊस हा तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा अंतिम निर्देशांक आहे.

पाच जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होत असून बळीराजाची व पेरणी झालेल्या पिकांची सर्व भिस्त या नक्षत्रावर आहे.