शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:28 IST

अनेकवेळा दिल्या भेटी

संजय सोनार / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ -चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध अतुट असे होते. त्यामुळे ते अनेकवेळा चाळीसगावी येऊन गेले. चाळीसगावात टांगा अपघातात बाबासाहेब गंभीर जखमी झाल्यामुळे अनेक दिवस त्यांचे वास्तव्य चाळीसगावात होते. त्यांनी या आठवणी पुस्तकात लिहिल्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व सहभागाने १९२७ मध्ये चाळीसगावातील दोस्त थिएटरजवळ दिनबंधू आंबेडकर आश्रम या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेची वसतीगृहात अनेक अस्पृश्य विद्यार्थी राहत होते. १९२७ ते १९३८ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या.२३ आॅक्टोबर १९२९ रोजी डॉ.बाबासाहेब चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर ते वसतीगृहात जाण्यासाठी टांग्यातून जात असताना पुलावर टांगा उलटला. त्यात बाबासाहेबांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे बरेच दिवस या संस्थेच्या वसतीगृहात वास्तव्य होते. या काळात त्यांचा सहवास अनेकांना लाभला. डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद दत्तू यांनी लिहीलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुभव व आठवणी या पुस्तकात चाळीसगाव येथील सत्कार व टांग्यातून पडून झालेल्या अपघाताबद्दल लिहीले आहे.डॉ.बाबासाहेब यांची प्रेरणा घेऊन दिवाण चव्हाण, अ‍ॅड. डी. आर. झाल्टे, डी.डी. चव्हाण, भगवान बागुल गुरुजी, यशवंत जाधव, पुंडलिक वाघ, सखाराम मोरे यांनी दिनबंधू आंबेडकर आश्रमाची स्थापना केली होती.दोन वेळा सभा : १७ जून १९३८ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आश्रमशाळेसमोर मोठी सभा झाली होती. त्यानंतर १९५१ मध्ये चाळीसगावच्या राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब यांचा सत्कार करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांना २००१ रुपये थैलीही अर्पण करण्यात आली होती. बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चाळीसगावातील सभा, सत्कार व अनुभव तसेच दिनबंधू आंबेडकर आश्रमाबाबत लिखाण केले होते.आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या अस्थिकलशातील काही अस्थींचे विसर्जन करुन पुतळ्याची पायाभरणी झाली आहे हे विशेष होय. अशा प्रकारे डॉ. आंबेडकर व चाळीसगाव यांचे अतुट असे नाते आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली व पदस्पर्शाने पावन झालेली दिनबंधू आंबेडकर आश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे. या पवित्र स्थळाची स्मारक न करता शिक्षणाचे कार्य सर्वांसाठी खुली करण्यासाठी या स्थळाचा वापर करावा, या मागणीसाठी या संस्थेचे अध्यक्ष प्रा. साहेबराव घोडे, सचिव धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी शासनदरबारी केली आहे.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीJalgaonजळगाव