शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:28 IST

अनेकवेळा दिल्या भेटी

संजय सोनार / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ -चाळीसगाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध अतुट असे होते. त्यामुळे ते अनेकवेळा चाळीसगावी येऊन गेले. चाळीसगावात टांगा अपघातात बाबासाहेब गंभीर जखमी झाल्यामुळे अनेक दिवस त्यांचे वास्तव्य चाळीसगावात होते. त्यांनी या आठवणी पुस्तकात लिहिल्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व सहभागाने १९२७ मध्ये चाळीसगावातील दोस्त थिएटरजवळ दिनबंधू आंबेडकर आश्रम या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेची वसतीगृहात अनेक अस्पृश्य विद्यार्थी राहत होते. १९२७ ते १९३८ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या.२३ आॅक्टोबर १९२९ रोजी डॉ.बाबासाहेब चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर ते वसतीगृहात जाण्यासाठी टांग्यातून जात असताना पुलावर टांगा उलटला. त्यात बाबासाहेबांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचे बरेच दिवस या संस्थेच्या वसतीगृहात वास्तव्य होते. या काळात त्यांचा सहवास अनेकांना लाभला. डॉ.बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद दत्तू यांनी लिहीलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुभव व आठवणी या पुस्तकात चाळीसगाव येथील सत्कार व टांग्यातून पडून झालेल्या अपघाताबद्दल लिहीले आहे.डॉ.बाबासाहेब यांची प्रेरणा घेऊन दिवाण चव्हाण, अ‍ॅड. डी. आर. झाल्टे, डी.डी. चव्हाण, भगवान बागुल गुरुजी, यशवंत जाधव, पुंडलिक वाघ, सखाराम मोरे यांनी दिनबंधू आंबेडकर आश्रमाची स्थापना केली होती.दोन वेळा सभा : १७ जून १९३८ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आश्रमशाळेसमोर मोठी सभा झाली होती. त्यानंतर १९५१ मध्ये चाळीसगावच्या राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब यांचा सत्कार करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांना २००१ रुपये थैलीही अर्पण करण्यात आली होती. बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चाळीसगावातील सभा, सत्कार व अनुभव तसेच दिनबंधू आंबेडकर आश्रमाबाबत लिखाण केले होते.आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या अस्थिकलशातील काही अस्थींचे विसर्जन करुन पुतळ्याची पायाभरणी झाली आहे हे विशेष होय. अशा प्रकारे डॉ. आंबेडकर व चाळीसगाव यांचे अतुट असे नाते आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली व पदस्पर्शाने पावन झालेली दिनबंधू आंबेडकर आश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे. या पवित्र स्थळाची स्मारक न करता शिक्षणाचे कार्य सर्वांसाठी खुली करण्यासाठी या स्थळाचा वापर करावा, या मागणीसाठी या संस्थेचे अध्यक्ष प्रा. साहेबराव घोडे, सचिव धर्मभूषण बागुल, नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी शासनदरबारी केली आहे.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीJalgaonजळगाव