शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी : कैद्यांची साक्ष आता व्हीसीद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:12 IST

न्यायालयाच्या वेळेतही बदल

जळगाव : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून न्यायालयाच्या कामकाजात मंगळवारपासून बदल करण्यात आला आहे. तसेच कैद्यांची साक्षही कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) सुरु करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. कार्यालयीत कर्मचाऱ्यांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी मंगळवारी आदेश काढले.या आदेशानुसार मंगळवारी फक्त सकाळसत्रातच कामकाज झाले. तालुका न्यायालयांसाठीही हीच वेळ निश्चित करण्यात आली आहे. न्यायायलयीन कर्मचारी, अधिकारी व वकील यांनी देखील खबरदारी म्हणून तोंडाला रुमाल व मास्क लावूनच कामकाज सुरु केले आहे. मंगळवारी ६० टक्के वकीलांनी तोंडाला रुमाल लावून कामकाज केले. कर्मचारी देखील हीच काळजी घेत आहे. भीती नाही, परंतु काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. वारंवार साबणाने हात धुणे, हस्तांदोलन टाळणे, किमान दोन मीटर अंतरावरुन संवाद साधणे ही काळजी घेतली जात असल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ जळमकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.रुमाल व मास्कला परवानगीकारागृहात दाखल असलेल्या कैद्याला नातेवाईकांनी रुमाल व मास्क आणून दिला तर ते देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कैद्यांच्या आरोग्य तपासणीसाठी रोज जिल्हा रुग्णालयातून डॉक्टर येत आहेत. आवश्यक असेल तरच डॉक्टर कैद्याला रुग्णालयात हलविण्याच्या सूचना देतात. त्या वेळी पोलिसांच्या माध्यमातून कैद्याला रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे गोसावी यांनी सांगितले. दरम्यान, कैदी पार्टी पोलिसांनाही सॅनेटरायझर व साबण पुरविण्यात येत आहे.कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच खबरदारीकारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व खबरदारीबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अधीक्षक आशिष गोसावी यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर, साबण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक असोत किंवा गुन्ह्यातील आरोपींना कारागृहात दाखल करायला येणारे पोलीस व आरोपी यांना बाहेरच हात स्वच्छ धुवून व तोंडाला रुमाल लावून प्रवेश दिला जात आहे. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना देखील तोंडाला रुमाल व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अति महत्त्वाचे जबाब व दोषारोपाचेच आरोपी न्यायालयातन्यायालयात खटला सुरु असलेल्या अति महत्वाच्या प्रकरणात ज्या कैद्याचा जबाब नोंदवायचा आहे किंवा दोषारोप ठेवायचा आहे, अशाच कैद्याला कारागृहातून न्यायालयात आणले जात आहे. अन्यथा सर्वच कैद्यांची साक्ष व इतर कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच घेतले जात आहे. प्रथमवर्ग व सत्र न्यायालय दोन्ही ठिकाणी हे कामकाज अशाच प्रकारे केले जात असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी दिली. तालुकास्तरावरील न्यायालयातही याच पध्दतीने कामकाज केले जात असून तेथीलही वेळेत बदल करण्यात आला आहे.अपर महासंचालकांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही सूचना दिल्या आहेत. अपवाद वगळता न्यायालयीन कामकाज व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे केले जात आहे. कैदी, त्यांना भेटायला येणारे नातेवाईक व कर्मचाºयांसाठी प्रवेशद्वारावरच साबण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे आल्यानंतर २० सेकंदात हात स्वच्छ धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -आशिष गोसावी, कारागृह अधीक्षककोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आरोपींची साक्ष देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जात आहे. महत्वाचे व तात्काळ कामकाजातच आरोपींना न्यायालयात आणले जात आहे. तेव्हा देखील आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Jalgaonजळगाव