शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाखांचे अनुदान हडपल्याच्या प्रकरणात संशयित मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:36 IST

नऊ महिने बेकायदेशीर चालले केंद्र

ठळक मुद्दे गुन्हा दाखल झाल्यानंतर पाठविला मान्यतेचा प्रस्ताव; न्यायालयाने फेटाळले होते अटकपूर्व

जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने काही संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, तरी देखील पोलिसांनी अद्याप एकाही संशयिताला अटक केलेली नाही. एरव्ही अनेक गुन्ह्यात आरोपी अटकेची घाई करणारी यंत्रणा या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा प्रश्न तक्रारदारांना पडला आहे.महाबळ परिसरातील निमजाई फांऊडेशनचे भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील यांनी खोट्या सह्या करुन मयुरेश्वर स्कुल आॅफ कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेचे बनावट कागदपत्रे तयार केले तसेच सदस्य भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनीही खोटा ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याचा गुन्हा दीड महिन्यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. एकीकडे हातात पुरावे असल्यानेच गुन्हा दाखल केला असे पोलीस सांगत असताना दुसरीकडे न्यायालयानेही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चौघांचा अटकपूर्व फेटाळला. असे असतानाही यात अजून कोणालाच अटक केली नाही. एका संशयिताला पोलिसांनी आणलेही होते, मात्र पुढे काय झाले हे कळलेच नाही.अनधिकृत सुरु होते केंद्रसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टÑ राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत रायपुर येथे सुरु केलेले केंद्र भूषण बक्षे व शीतल पाटील यांनी पिंप्राळा येथे हलविल्याचे दाखविले, प्रत्यक्षात तेथे काहीच सुरु नाही. गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हे केंद्र चालविले जात आहे.या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या केंद्राला मान्यता देण्याचा प्रस्ताव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने मुंबई कार्यालयात पाठविला.त्याआधी ९ महिने हे केंद्र अनधिकृतच चालले. गुन्हा दाखल झाल्यानंतर नवीन पत्याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, इतर सात केंद्रामध्ये हजेरीत बनवेगिरी आढळून आल्याने त्यांचा अनियमिततेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, त्याच प्रमाणे निमजाईच्या या केंद्रातील हजेरीही संशयास्पद आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचीही चर्चा आहे. पोलीस तपास सुरु आहे इतकेच सांगत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.स्थानिक अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यातकोणत्याही केंद्राचा पत्ता बदल करावयचा असेल तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा तपासणी अहवाल शासनाकडे पाठवावा लागतो. या कार्यालयाने इतर सात केंद्राचा अनियमिततेचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला, मग याच केंद्राचा का पाठविला नव्हता, असाही प्रश्न निर्माण होत आहे. तपासाधिकाऱ्यांनी मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे मिळविली असून स्थानिक अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.पोलीस म्हणतात, तपास सुरु आहेया प्रकरणात आरोपींना अटकेबाबत प्रभारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षकरणजीत शिरसाठ यांना विचारला असता पुरावा असल्यानेच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अजूनही तपास सुरु आहे. त्यासाठी तपासाधिकारी मुंबईलाही जावून आले. आरोपींच्या अटकेबाबत बोलण्यास मात्र त्यांनी टाळले. संदीप यांच्याशी संपर्क साधला असता ते औरंगाबाद येते खंडपीठात होते.यापूर्वीच फेटाळला यांचा अटकपूर्वनिमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४०) मोहीनी भरत भंगाळे (३१) दोन्ही रा.भवानी पेठ, राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी