शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

कालवे व पाटचाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 9:46 PM

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी : जामदा उजवा-डावा कालवा व पाटचारीची दुरवस्था

भडगाव : गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढली असून सफाई करण्यात यावी. यासह काही ठिकाणी दुरुस्ती व पाटचाऱ्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.रब्बी हंगामातील पिकांना कालव्यांच्या आवर्तनानुसार पाण्याचा लाभ मिळण गरजेचे आहे. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभागाने तात्काळ या कामांना सुरुवात करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.यावर्षी सर्वत्र धो धो पाऊस बरसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक वर्षांतून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. नाशिक जिल्हयातील गिरणा धरणावर गिरणा नदीतील पाण्याची आवक अवलंबून आहे. मात्र यावर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने गिरणा काठावरील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन गिरणा नदीला सुरुच असल्याने गिरणामाय खळखळून वाहत आहे. त्यात आता रब्बी हंगामासाठीही गिरणा नदीला व गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले आहे. कालव्यांना सुरुवातीस २ पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहीती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. यावर्षी गिरणा जामदा उजवा व डावा कालव्यालगत दुतर्फा गवत, झडपांसह घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे कालवे अस्वच्छ बनले आहेत. दोघा कालव्यांना काही ठिकाणी व मुख्य पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. आता रब्बी हंगामाला कालव्यांतून पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. तरी पाटबंधारे विभागाने तत्काळ गिरणा जामदा उजवा व डावा कालव्याची दुतर्फा साफसफाई करावी. तसेच काही ठिकाणी कालव्याच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.