शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:08 IST

पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम हिंगोणा ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ठळक मुद्देयावल तालुक्यात हिंगोणा येथील उपक्रमसर्वांना समान पाणी मिळण्यास होणार मदतपाणीटंचाईला कंटाळून ग्रामस्थ व हिंगोणेकर मित्र मंडळाने शासन व प्रशासनाकडे केला होता पाठपुरावाविद्यमान सरपंचांनी विषय धरला उचलूनग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास

हिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.गावात गेल्या १० वर्षांपासून पाणीटंचाई उद्भवत असल्याने तब्बल १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. याला कंटाळून ग्रामस्थांनी व हिंगोणेकर मित्रमंडळ, पुणे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्राम पंचायत कार्यकारी मंडळाला वारंवार निवेदने दिली. त्यात गावातील पाणीटंचाई निवारण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व कार्यकारी मंडळाने पाण्यासाठी आजपर्यंत काय उपायोजना केल्या, असे प्रश्न उपस्थित केले होेते. गावातील महिलांनीदेखील यावल येथे पंचायत समितीत व ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा नेऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत मुख्य जलवाहिनीवरून घेतलेले नळ कनेक्शन बंद करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी केली होती.त्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी १२ मार्च रोजी ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचे निवारण करण्याबाबत, तसेच गावातील मुख्य जलवाहिनीवरील घेतलेले नळ कनेक्शन तत्काळ बंद करावे, अशी नोटीस दिली होती. त्यावर सरपंच सत्यभामा भालेराव यांनी तत्काळ दखल घेत आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच सरपंचांनी मुख्य जलवाहिनीवरील घेतलेले अवैध नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत १० अवैध नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे थोडा फार का होईना, पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सरपंचांनी घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.तसेच मोर धरणापासून जलस्वराज प्रकल्पाची मुख्य जलवाहिनी गावात आली असून, या जलवाहिनीवरसुद्धा व्हॉल्व्ह बसविण्यात यावा. जेणेकरून या जलवाहिनेचे पाणी सरळ गावात न जात जलकुंभात पडेल व जलकुंभ चांगल्याप्रकारे भरेल, अशी मागणीसुद्धा गावातील महिला व ग्रामस्थ करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल