शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:21 IST

अडीच लाख ग्राहकांची जबाबदारी आता केवळ १५० कर्मचाऱ्यांवर

जळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून निवृत्ती पत्करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जानेवारी रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामध्ये वर्ग १ आणि २च्या २६ अधिकाºयांचा समावेश आहे. यापुढे केवळ १५० कर्मचाºयांना ५५० कर्मचाºयांचं काम करून ग्राहकांना सेवा पुरवावी लागणार आहे.बीएसएनएल कंपनीला गेल्या काही वर्षांमध्ये घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने बीएसएनएलच्या कर्मचाºयांसमोर केंद्र सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला. अनेक वर्षे कौटुंबिक वातावरण जपत, त्या कार्यालयात काम केले, ते कार्यालय डबघाईला आले म्हणून सोडून जाणे अनेक कर्मचाºयांना पटणारे नव्हते. मात्र केंद्र शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबल्याने अनेक कर्मचाºयांनी जड मनाने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारला.जळगाव जिल्ह्यात बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी मिळून जवळपास ५५० लोक आहेत. त्यातील जवळपास ४०० लोकांनी ३१ जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली.कार्यालय आर्थिक डबघाईस आले असताना, कर्मचाºयांची समर्थपणे सेवा करायची तयारी असतानाही शासनाच्या आडमुठे धोरणामुळे ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवसात बीएसएनएलची साथ सोडली. यामध्ये वर्ग-१ आणि वर्ग-२च्या २६ कर्मचाºयांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात अविरतपणे लाखो कर्मचाºयांना सेवा देण्याचे अवघड काम आता अवघ्या १५० कर्मचाºयांना करावे लागणार आहे. या १५०पैकी २२ कर्मचारी टप्प्याटप्प्याने मे महिन्यापर्यंत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत.अखेरच्या दिवशीही सायंकाळी उशिरापर्यंत सेवाहोय! नोकरीचा तो अखेरचा दिवस! पण कोठेही सत्कार समारंभ नव्हता वा निवृत्तीचा निरोप समारंभही नव्हता. उलट शहरात महामार्गाच्या कामामुळे आणि अमृत योजनेमुळे विस्कटलेली सेवेची घडी बसवण्यातच कर्मचारी ‘फिल्ड’वर सायंकाळी उशिरापर्यंत गुंग होते.कुटुंब विस्कटलं, न भरण्यासाठी!अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी निवृत्त होतात, स्वेच्छानिवृत्ती घेतात, त्याठिकाणी नव्याने कर्मचारी नियुक्त केले जातात. पण बीएसएनएलची स्थिती आज वेगळी आहे. हे रिकामं झालेलं कुुटुंब पुन्हा न भरण्याच्या अटीवर रिकामं करण्यात आलं आहे, हे विशेष!रिकाम्या कार्यालयाचा पहिला दिवसशुक्रवारी तब्बल ४०० कर्मचारी कमी झाल्याने बीएसएनएलमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. कॅश काऊंटरलाही कर्मचारी नव्हता. याठिकाणी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे.दूरसंचार क्षेत्रात खासगी कंपन्या ताकदीनिशी उतरलेल्या असताना जलद आणि विनम्र सेवेची अपेक्षा करणाºया ग्राहकांना सेवा देताना आता बीएसएनएल कर्मचाºयांच्या नाकीनऊ येणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव