शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:21 IST

अडीच लाख ग्राहकांची जबाबदारी आता केवळ १५० कर्मचाऱ्यांवर

जळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून निवृत्ती पत्करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जानेवारी रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामध्ये वर्ग १ आणि २च्या २६ अधिकाºयांचा समावेश आहे. यापुढे केवळ १५० कर्मचाºयांना ५५० कर्मचाºयांचं काम करून ग्राहकांना सेवा पुरवावी लागणार आहे.बीएसएनएल कंपनीला गेल्या काही वर्षांमध्ये घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने बीएसएनएलच्या कर्मचाºयांसमोर केंद्र सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला. अनेक वर्षे कौटुंबिक वातावरण जपत, त्या कार्यालयात काम केले, ते कार्यालय डबघाईला आले म्हणून सोडून जाणे अनेक कर्मचाºयांना पटणारे नव्हते. मात्र केंद्र शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबल्याने अनेक कर्मचाºयांनी जड मनाने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारला.जळगाव जिल्ह्यात बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी मिळून जवळपास ५५० लोक आहेत. त्यातील जवळपास ४०० लोकांनी ३१ जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली.कार्यालय आर्थिक डबघाईस आले असताना, कर्मचाºयांची समर्थपणे सेवा करायची तयारी असतानाही शासनाच्या आडमुठे धोरणामुळे ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवसात बीएसएनएलची साथ सोडली. यामध्ये वर्ग-१ आणि वर्ग-२च्या २६ कर्मचाºयांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात अविरतपणे लाखो कर्मचाºयांना सेवा देण्याचे अवघड काम आता अवघ्या १५० कर्मचाºयांना करावे लागणार आहे. या १५०पैकी २२ कर्मचारी टप्प्याटप्प्याने मे महिन्यापर्यंत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत.अखेरच्या दिवशीही सायंकाळी उशिरापर्यंत सेवाहोय! नोकरीचा तो अखेरचा दिवस! पण कोठेही सत्कार समारंभ नव्हता वा निवृत्तीचा निरोप समारंभही नव्हता. उलट शहरात महामार्गाच्या कामामुळे आणि अमृत योजनेमुळे विस्कटलेली सेवेची घडी बसवण्यातच कर्मचारी ‘फिल्ड’वर सायंकाळी उशिरापर्यंत गुंग होते.कुटुंब विस्कटलं, न भरण्यासाठी!अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी निवृत्त होतात, स्वेच्छानिवृत्ती घेतात, त्याठिकाणी नव्याने कर्मचारी नियुक्त केले जातात. पण बीएसएनएलची स्थिती आज वेगळी आहे. हे रिकामं झालेलं कुुटुंब पुन्हा न भरण्याच्या अटीवर रिकामं करण्यात आलं आहे, हे विशेष!रिकाम्या कार्यालयाचा पहिला दिवसशुक्रवारी तब्बल ४०० कर्मचारी कमी झाल्याने बीएसएनएलमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. कॅश काऊंटरलाही कर्मचारी नव्हता. याठिकाणी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे.दूरसंचार क्षेत्रात खासगी कंपन्या ताकदीनिशी उतरलेल्या असताना जलद आणि विनम्र सेवेची अपेक्षा करणाºया ग्राहकांना सेवा देताना आता बीएसएनएल कर्मचाºयांच्या नाकीनऊ येणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव