शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून तरुणाचा निर्घूण खून, दोन जण जखमी 

By विजय.सैतवाल | Updated: December 10, 2023 22:05 IST

समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली. 

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेल्या काही वर्षांपासून असलेले आपसातील वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाला बोलवून त्याच्यावर चॉपरने सपासप वार करत त्याचा निर्घूण खून करण्यात आला. या वेळी त्याच्या सोबत असलेल्या आशीष संजय सोनवणे व भावाला वाचविण्यासाठी गेलेला गोकूळ बळीराम सोनवणे यांच्यावरही वार करण्यात आल्याने हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली. 

समतानगर परिसरात जुन्या वादातून रविवारी सकाळी अरुण व काही तरुणांमध्ये पुन्हा वाद उद्धभवला होता. त्यावेळी हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने वाद झालेल्या तरुणांनी अरुण सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे बोलवले. अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हादेखील तिथे धावत गेला. तोवर मारेकऱ्यांनी अरुणवर चॉपरने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले तर सोबत असलेला आशीष संजय सोनवणे याच्यावरही वार करण्यात आले. भावावर होत असलेले वार रोखण्यासाठी गेल्याने गोकुळ बळीराम सोनवणे याच्याही हातावर जखमा झाल्या.  घटनेनंतर तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी