शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जुन्या वादातून तरुणाचा निर्घूण खून, दोन जण जखमी 

By विजय.सैतवाल | Updated: December 10, 2023 22:05 IST

समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली. 

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेल्या काही वर्षांपासून असलेले आपसातील वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाला बोलवून त्याच्यावर चॉपरने सपासप वार करत त्याचा निर्घूण खून करण्यात आला. या वेळी त्याच्या सोबत असलेल्या आशीष संजय सोनवणे व भावाला वाचविण्यासाठी गेलेला गोकूळ बळीराम सोनवणे यांच्यावरही वार करण्यात आल्याने हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवार, १० डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समतानगर परिसरातील वंजारी टेकडीवर घडली. 

समतानगर परिसरात जुन्या वादातून रविवारी सकाळी अरुण व काही तरुणांमध्ये पुन्हा वाद उद्धभवला होता. त्यावेळी हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने वाद झालेल्या तरुणांनी अरुण सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे बोलवले. अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हादेखील तिथे धावत गेला. तोवर मारेकऱ्यांनी अरुणवर चॉपरने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले तर सोबत असलेला आशीष संजय सोनवणे याच्यावरही वार करण्यात आले. भावावर होत असलेले वार रोखण्यासाठी गेल्याने गोकुळ बळीराम सोनवणे याच्याही हातावर जखमा झाल्या.  घटनेनंतर तिघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी