शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

आपसातील मतभेदांमुळे विकासाला बसतोय ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 20:00 IST

जळगाव जिल्हा परिषदेत नियोजनाचा अभाव

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यातील आपसातील मतभेदामुळे विकासकामांना खिळ बसली आहे. वेळेवर नियोजन होत नसल्यामुळे निधी खर्च न होता विकासकामे रखडत आहेत. दुर्दैव असे की यंदाही हीच स्थिती आहे.यंदाविविध विकास कामांचे नियोजन तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवे होते मात्र दोन महिन्यापूर्वी उशिराने निधी खर्चाचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला गेला. हा विषय अजेंड्यावर न घेता आयत्या वेळेच्या विषयात घेतल्या मुळे तो मंजूर होवू शकला नाही. आर्थिक विषय आयत्या वेळी घेता येत नसल्याने तेव्हा हा विषय मंजूर न झाल्याने गेल्या महिन्यातविशेष सर्वसाधारण सभा खास या विषयाच्या निमित्ताने बोलविण्यात आली. या सभेत १०४ कोटीच्या कामांचे नियोजन करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना सत्ताधारी गटाने बहुमताने दिला. मात्र यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण २९ सदस्यांनी या ठरावाला लेखी विरोध दर्शवून निधीचे समान वाटप करावे अशी मागणी केली. परंतु ठरावाच्या बाजुने सत्ताधारी गट असल्याने या विरोधाचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर मात्र पदाधिकाºयांनी आपसात अधिक निधी वाटप करुन सदस्यांना केवळ १५ लाखांच्या आसपास निधी दिल्याचे समजताच सर्वच जि. प. सदस्यांमध्ये नाराजी पसरली. या नाराजीतूनच भाजपाच्या सत्ताधारी गटाच्या ५ सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी यांना निवेदन देवून जिल्हा परिषदेचा स्व व इतर निधीचे सर्व सदस्यांना समान वाटप व्हावे. तसेच कामांचे नियोजन झाल्यावर सर्व कामांच्या याद्या जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी साठी ठेवाव्या, अशी मागणी केली आहे. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना विशेष सभेने दिलेल्या निधी नियोजनाच्या व वाटपाच्या अधिकाराविरुद्धच हे पाऊल ऊचलले गेले आहे. दरम्यान अध्यक्षांना निधीचे नियोजन करण्याच्या अधिकार देताना एकूण ६७ पैकी विरोधातील २९ सदस्यांनी लेखी विरोध आधीच केला होता. आता ५ सत्ताधारी सदस्यांनी विरोध केल्याने ही संख्या ३४ वर गेली आहे. यामुळे बहुमत हे विरोधाच्या बाजुने आता आले आहे. यामुळे हा विरोध कायम राहील्यास इतिवृत्त मंजुरीच्या वेळेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा कामे वाटपात खोडा निर्माण होवू शकतो व पुन्हा नियोजन लांबणीवर पडू शकते. यामुळे आपसातील मतभेद मिटणे गरजेचे आहे. राज्यात भाजपाचेच सरकार असताना जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपाकडून लोकांना अधिक अपेक्षा आहे मात्र अधिक कामे तर सोडाच आहे तो निधी व्यवस्थित खर्च होत नसल्याने लोकांमध्ये व सदस्यांमध्येही नाराजी आहे. यामुळे पदाधिकाºयांंनी सर्वांना सोबत घेवून त्यांचा विश्वास संपादन करुन विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव