शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

आपसातील मतभेदांमुळे विकासाला बसतोय ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 20:00 IST

जळगाव जिल्हा परिषदेत नियोजनाचा अभाव

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यातील आपसातील मतभेदामुळे विकासकामांना खिळ बसली आहे. वेळेवर नियोजन होत नसल्यामुळे निधी खर्च न होता विकासकामे रखडत आहेत. दुर्दैव असे की यंदाही हीच स्थिती आहे.यंदाविविध विकास कामांचे नियोजन तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवे होते मात्र दोन महिन्यापूर्वी उशिराने निधी खर्चाचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला गेला. हा विषय अजेंड्यावर न घेता आयत्या वेळेच्या विषयात घेतल्या मुळे तो मंजूर होवू शकला नाही. आर्थिक विषय आयत्या वेळी घेता येत नसल्याने तेव्हा हा विषय मंजूर न झाल्याने गेल्या महिन्यातविशेष सर्वसाधारण सभा खास या विषयाच्या निमित्ताने बोलविण्यात आली. या सभेत १०४ कोटीच्या कामांचे नियोजन करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना सत्ताधारी गटाने बहुमताने दिला. मात्र यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण २९ सदस्यांनी या ठरावाला लेखी विरोध दर्शवून निधीचे समान वाटप करावे अशी मागणी केली. परंतु ठरावाच्या बाजुने सत्ताधारी गट असल्याने या विरोधाचा काहीच उपयोग झाला नाही. यानंतर मात्र पदाधिकाºयांनी आपसात अधिक निधी वाटप करुन सदस्यांना केवळ १५ लाखांच्या आसपास निधी दिल्याचे समजताच सर्वच जि. प. सदस्यांमध्ये नाराजी पसरली. या नाराजीतूनच भाजपाच्या सत्ताधारी गटाच्या ५ सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी यांना निवेदन देवून जिल्हा परिषदेचा स्व व इतर निधीचे सर्व सदस्यांना समान वाटप व्हावे. तसेच कामांचे नियोजन झाल्यावर सर्व कामांच्या याद्या जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी साठी ठेवाव्या, अशी मागणी केली आहे. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना विशेष सभेने दिलेल्या निधी नियोजनाच्या व वाटपाच्या अधिकाराविरुद्धच हे पाऊल ऊचलले गेले आहे. दरम्यान अध्यक्षांना निधीचे नियोजन करण्याच्या अधिकार देताना एकूण ६७ पैकी विरोधातील २९ सदस्यांनी लेखी विरोध आधीच केला होता. आता ५ सत्ताधारी सदस्यांनी विरोध केल्याने ही संख्या ३४ वर गेली आहे. यामुळे बहुमत हे विरोधाच्या बाजुने आता आले आहे. यामुळे हा विरोध कायम राहील्यास इतिवृत्त मंजुरीच्या वेळेस अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा कामे वाटपात खोडा निर्माण होवू शकतो व पुन्हा नियोजन लांबणीवर पडू शकते. यामुळे आपसातील मतभेद मिटणे गरजेचे आहे. राज्यात भाजपाचेच सरकार असताना जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपाकडून लोकांना अधिक अपेक्षा आहे मात्र अधिक कामे तर सोडाच आहे तो निधी व्यवस्थित खर्च होत नसल्याने लोकांमध्ये व सदस्यांमध्येही नाराजी आहे. यामुळे पदाधिकाºयांंनी सर्वांना सोबत घेवून त्यांचा विश्वास संपादन करुन विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव