शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

दोनही आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क... आम्हाला त्या आठवणींचा प्रचंड अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२९ च्या सुमारास आसोदा, ता. जळगाव येथे भेट दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२९ च्या सुमारास आसोदा, ता. जळगाव येथे भेट दिली होती. यावेळी त्यांचे स्वागत करणारे आमचे आजोबा दगाजी पाटील, दुसरीकडे वाघाडी, ता. शिरपूर येथील आईचे वडील जहांगीरदार पवार यांचा एका खटल्यानिमत्त बाबासाहेबांशी संपर्क आला. आमच्या नातेवाइकांकडून या आठवणी ऐकल्या आहेत. आज या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, अशा भावना मूळचे आसोदा येथील रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक असलेले प्रकाश भास्करराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रकाश पाटील वय ६७ हे गेल्या ५० वर्षांपासून धुळे येथे अभियंता म्हणून स्थायिक आहेत. त्यांचे मूळ गाव हे आसोदा, ता. जळगाव. या गावातील दगा मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले दगाजी श्यामराव पाटील हे त्यांचे आजोबा व त्यांच्या आजोबांचे काका दौलतराव पाटील यांनी आसोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले होते. तो क्षण थेट आजोबांकडून ऐकायला मिळाला नाही. आजोबांचे आम्ही लहान असतानाच निधन झाले. मात्र, काका व आजींकडून या ऐतिहासिक आठवणी आम्ही ऐकल्या आहेत. थोर व्यक्तिमत्त्वाशी आमच्या आजोबांचा आलेला संपर्क आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रकाश पाटील सांगतात. शिवाय आसोद्याच्या या ऐतिहासिक भेटीबाबत साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल यांनीही भेटीदरम्यान आपल्याशी चर्चा केल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

शिरपूरच्या खटल्यासंदर्भात संपर्क

वघाडी हे आमच्या आईच्या वडिलांचे गाव. जहांगीरदार पवार. वाघाडी येथील आमच्या मामांकडून ऐकल्यानुसार बैलपोळ्याच्या एका वादासंदर्भातील खटला लढविण्यासाठी बाबासाहेब धुळे येथे आले होते. त्यावेळी आमच्या आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क आला होता. त्यावेळी मामांनी या आठवणी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांना ते कसे घ्यायला गेले होते, कोर्टात खटला कसा चालला, अशा आठवणी ऐकल्यानंतर आजही अगदी डोळ्यासमोरच असल्याचा भास देऊन जातात. धुळे येथील कंवर वकील यांचे पणजोबा यांनी त्यावेळी बाबासाहेबांचे सहायक म्हणून काम पाहिले होते. वकिलपत्रावर त्यांचीही स्वाक्षरी आहे, असेही प्रकाश पाटील यांनी सांगितले.

आजोबा पुरोगामी विचारांचे

आजोबा दगाजी पाटील यांची विचारसरणी ही पुरोगामी हाेती. त्यांनी आमच्या सर्व कुटुंबावर समानतेचे संस्कार केले. जात-पात हा विषयच कधी आमच्यात आला नाही, आम्ही तसा कधी विचारही केला नाही, असेही प्रकाश पाटील सांगतात.