शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

भुसावळ येथे बोगी व शुध्द जलनिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:47 IST

डीआरएम आर.के. यादव यांची ‘लोकमत’ भेटीत माहिती

ठळक मुद्दे२५ ठिकाणी भुयारी मार्ग बनवून रेल्वे गेट बंद करणारनवीन गाड्यांचा अद्याप विचार नाही

जळगाव : रेल्वेच्या माध्यमातून भुसावळ येथे ४०० कोटींचा आधुनिक बोगी निर्मिती कारखाना व रेल शुद्ध जल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधक (डीआरएम) आर. के. यादव यांनी दिली.‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक (डीसीएम) सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडळ अभियंता उत्तर विभाग ( डिईएन) दीपक कुमार, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी उपस्थित होते.२०० एक्सप्रेस व ८० मालगाड्यायावेळी माहिती देताना यादव म्हणाले, रेल्वेमार्गावरील भुसावळ विभाग हा सर्वांत मोठा विभाग असून, इगतपुरीपासून ते अमरावती व मध्यप्रदेशातील खंडवापर्यंतचा भाग भुसावळ विभागात येतो. एकूण १२ जिल्ह्यातील लहान-मोठ्या रेल्वे स्टेशनचा यामध्ये समावेश आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत २४ तासांत या मार्गावर विविध ठिकाणी जाणाऱ्या २०० प्रवासी व ८० मालगाड्या धावतात. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भुसावळ विभागात गेल्या वर्षी ६ ठिकाणचे गेट बंद करून या ठिकाणी भुयारी बोगदे तयार केले आहेत. भविष्यात याचप्रमाणे २५ ठिकाणचे रेल्वे गेट बंद केले जातील.२२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढणारकाही ठिकणी रेल्वे फलाट आणि रेल्वेच्या दरवाजा पर्यंतची उंची जास्त असल्यामुळे अपघात होत असतात. यासाठी भुसावळ विभागात येणाºया २२ स्टेशनवरील फलाटांची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे.आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरेरेल्वे स्टेशन व परिसरातील सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. साधारणत: एक किलोमीटर पर्यंत त्या व्यक्तीची हालचाल यामध्ये कैद होतील. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ व बडनेरा या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भुसावळला १०८ कॅमेरे बसविले आहेत.दोन मोठे प्रकल्पभुसावळ येथे येत्या काळात ४०० कोटी रुपये खर्च करून आधुनिक बोगी निर्मितीचा कारखाना उभारला जाईल तसेच ‘रेल जल’ हा शुद्ध बाटलीबंद पाणी निर्मितीचा कारखानाही होणार आहे.मॉडेल स्टेशनवर वायफाय सुविधा सुरूजळगाव-भुसावळ दरम्यान तिसरी लाईन पूर्ण, चौथ्या लाईनचे काम भूसंपादनाच्या अडचणीमुळे स्वत:च्या जागेतच काम करणारभविष्यात मनमाड व त्यानंतर इगतपुरी तसेच दौडपर्यंत तिहेरी लाईन झाल्यावर गाड्यांची संख्या वाढणारचाळीसगाव- धुळे मार्गावर इलेक्ट्रीक इंजिनचा वापर सुरू झाल्याने व ट्रॅकच्या सुधारणेने वेग मर्यादा ताशी ६० वरून १०० कि.मी. केली जाणारनवीन शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामासाठी १५ आॅक्टोपरपासून जुना पूल पाडण्यास प्रारंभ होणारभुसावळ विभागात सरकते जिने, लिफ्ट, रेस्टॉरंट, फलाटांची लांबी वाढविणे, छत उभारणे अशी कामे सुरु आहेत.सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून जळगाव रेल्वे स्टेशनचे सुुशोभिकरण प्रस्तावित

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव