शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुले जिवंत होण्याच्या आशेने जळगावात मृतदेह ठेवले मिठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:42 IST

फिरायला आलेल्या दोन भावंडांचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू

जळगाव : शहरातील मेहरुण तलावाजवळ फिरण्यासाठी गेलेल्या तीन भावांपैकी दोघा भावंडाचा बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली़ तर त्यांचा तिसरा भाऊ अनस मात्र बचावला. मोहम्मद उमेर जकी अहमद (वय-१२) व अबुलैस जकी अहमद (वय १६) अशीे मयत बालकांची नावे आहेत़ मात्र बुडालेल्या व्यक्तीचे मृतदेह मिठात बुडवून ठेवल्यास ती व्यक्ती जिवंत होते, असा सोशल मिडियावरील मेसेज वाचून या बालकांचे मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवगृहातच मिठात बुडवून ठेवण्याचा खळबळजनक प्रकार घडला.शहरातील मेहरुण परिसरातील अक्सा नगरातील अल अजीज अपार्टमेंटमध्ये राहणारे अबुलैस, उमेर व अनस (वय-१४) हे तिघे भाऊ मेहरुण तलाव परीसरात दुचाकीने फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुचाकी एका जागेवर उभी करून तलावाजवळ फिरत असतांना उमेर याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला व बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी अबुलैस हा पाण्यात उतरला़ मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्यात गाळ असल्याने दोघे जण बुडू लागले. दोन्ही भाऊबुडत असल्यामुळे तिसरा भाऊ अनस हा भेदरला आणि भावांना कुणीतरी वाचवावे म्हणून जोरजोरात आरडा-ओरड करत तो देखील पुढे सरसावला. मात्र तो बुडायला लागताच त्याने आरडा-ओरड केल्यानंतर तलाव परिसरात पोहणारे परवेज अख्तर सबिरोद्दीन पिरजादे, बबलू पिरजादे, मोहम्मद फैज, मोहसीन शेख, तेहसीम शेख यांना त्याचा आवाज ऐकू आला व कुणीतरी बुडत असल्याचे दिसले़ त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्याठिकाणी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तोपर्यंत अबुलैस व उमेर हे पाण्यात बुडाले होते. यावेळी पोहोणाऱ्यांनी अनसला तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे तो बचावला. त्यानंतर बुडालेल्या बालकांना बाहेर काढले़ मात्र, दोघांचा मृत्यू झालेला होता़ त्यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात नेले़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोन्ही बालकांना मृत घोषित केले़सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणीएकाच कुटूंबातील दोघ भावंडांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांसह मित्रमंडळींनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. मेहरुण तलावात आजपर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या तलावाजवळ सुरक्षा रक्षकांची नेमणुक करावी. अन्यथा हा तलावात भर टाकून तो बुजून टाकावा अशी मागणी अनिस शेख अकबर यांनी केली. याबाबत आयुक्तांना देखील निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अन् जिल्हा रूग्णालयातच मिठात ठेवले मृतदेहबुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीला जाड (मोठ्या खड्यांच्या) मिठात ठेवल्यास तो जिवंत होतो, असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. रुग्णालयात दोघा भावंडाचे मृतदेह आणल्यानंतर काही जणांनी या मेसेजची माहीती नातेवाईकांना दिल्यानंतर शवविच्छेदन गृहात मिठ आणून दोन्ही बालकांचे मृतदेह मिठामध्ये ठेवण्यात आले़ या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.हृदय हेलावणारा आक्रोशदोन्ही भावांच्या मृत्यूची बातमी अक्सानगरात पसरताच जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृत बालकांचे वडील जकी अहमद हे पहूरपेठ शाळेत शिक्षक आहेत.त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात हृदय हेलावून टाकणारा आक्रोश केला होता. मुलांचा मृत्यू झाल्यामुळे वडील जकी अहमद यांना धक्काच बसला होता़तर भावांचा सुध्दा आक्रोश सुरू होता़ बालकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ बालकांच्या पश्चात आई-वडील व तीन भाऊ असा परिवार आहे़ अबुलैस हा इकरा महाविद्यालयात अकरावीला होता़ तर उमेर हा मिल्लत हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता़हा चुकीचा समज आहे़ एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर ती परत जिवंत होत नाही़ मिठाच्या ढिगाºयात मृतदेह ठेवल्यास ती व्यक्ती जिवंत होते या व्हॉटस्अ‍ॅपवर आलेल्या संदेशामुळे नागरिकांची फसवणुक होत आहे़ कुणीही नागरिकांच्या भावनांशी खेळू नये़- डॉ़ प्रदीप जोशी, मानसिकस्वास्थ टीम प्रमुख,़ अंधश्रध्दा निर्मुलन समिती

टॅग्स :Jalgaonजळगाव